महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

फडणवीस सरकार घालवायचे तर मनसेला सोबत घ्या; आघाडीतील मित्र पक्षांची मागणी

मित्र पक्षांनी एकत्र येऊन विधानसभा निवडणुकीत कोणत्या विषयांवर जनतेपुढे जायचे यावर आज बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घेतले पाहिजे अशी भूमिका मित्रपक्षांच्या वतीने घेण्यात आली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून प्रत्येकी 120 आणि दरम्यानच्या जागा वाटपाचा विषय मार्गी लागला असून मित्रपक्षांना आघाडीमध्ये 41 जागा देण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला आहे.

By

Published : Sep 10, 2019, 10:40 PM IST

आघाडीतील मित्र पक्ष

मुंबई- राज्यात फडणवीस सरकार घालवायचे असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घेतले पाहिजे. अशी भूमिका आज आघाडीतील मित्र पक्षांकडून जाहीर करण्यात आली. मुंबईतील शेकाप कार्यालयात झालेल्या बैठकीत आघाडीसोबत येत असलेल्या मित्र पक्षांनी ही भूमिका जाहीर केली.

प्रतिक्रिया देताना आमदार व शेकाप नेते जयंत पाटील


काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाटपाचा तिढा काही जागांचा अपवाद सोडल्यास सुटल्यात जमा आहे. मित्र पक्षांनी एकत्र येऊन विधानसभा निवडणुकीत कोणत्या विषयांवर जनतेपुढे जायचे यावर आज बैठक घेतली होती. यावेळी शेकापचे अध्यक्ष जयंत पाटील, यांच्यासह सीपीआयचे प्रकाश रेड्डी, अशोक ढवळे, माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे- पाटील आदी नेते उपस्थित होते. आमच्याकडुन जागावाटपाच्या निर्णयाबाबतची सर्व मित्र पक्षांची बैठक 17 तारखेला होणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले.

हेही वाचा-पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसला 'गुडबाय'


केंद्रातील आणि राज्यातील विरोधी सरकारमुळे लोकशाही धोक्यात आली आहे. लोकांना विविध माध्यमातून संपवले जात आहे. त्यामुळे मित्रपक्षांमध्ये असलेले सर्व मतभेद विसरून एकत्र येण्याची हीच खरी वेळ आहे. त्यामुळे आम्ही सर्व आघाडीच्या माध्यमातून परस्पर पूरक असा विषय जागा वाटपाच्या संदर्भात घेणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून प्रत्येकी 120 आणि दरम्यानच्या जागा वाटपाचा विषय मार्गी लागला असून मित्रपक्षांना आघाडीमध्ये 41 जागा देण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details