महाराष्ट्र

maharashtra

Rana Couple Bail Petition Hearing : राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर सोमवारी निकाल

By

Published : Apr 30, 2022, 3:36 PM IST

Updated : Apr 30, 2022, 6:20 PM IST

हनुमान चालीसा प्रकरणात ( Hanuman Chalisa Row ) कारागृहात असलेल्या राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज सत्र ( Hearing On Rana Bail Petition ) न्यायालयात सुनावणी झाली आहे. सोमवारपर्यंत हा निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. त्यामुळे आज आणि उद्याची रात्र राणा दाम्पत्यांना तुरुंगातच काढावी लागणार आहे.

Navneet Rana And Ravi Rana Case
Navneet Rana And Ravi Rana Case

मुंबई -हनुमान चालीसा प्रकरणात( Hanuman Chalisa Row ) कारागृहात असलेल्या राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज सत्र ( Hearing On Rana Bail Petition ) न्यायालयात सुनावणी झाली आहे. सोमवारपर्यंत हा निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. त्यामुळे आज आणि उद्याची रात्र राणा दाम्पत्यांना तुरुंगातच काढावी लागणार आहे. याबाबतचा युक्तिवाद आज पूर्ण झाला असून, आता थेट सोमवारीच न्यायालय निकाल देणार आहे.

दरम्यान, राणा दाम्पत्यानी( Rana Couple Application For Home Food ) घरचे जेवण मिळावे, यासाठी मुंबई सत्र न्यायालयात( Mumbai Sessions Court ) अर्ज दाखल केला होता. मात्र, सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याचा अर्ज फेटाळला आहे. हनुमान चालीसा प्रकरणी आंदोलन केल्यामुळे अमरावतीच्याखासदार नवनीत राणाआणि आमदार रवी राणायांच्यावर खार पोलीस ठाण्यात विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक करुन न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने राणा दाम्पत्याचा जामीन अर्ज फेटाळत त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी ठोठावली होती.

राणांच्या जामीन अर्जाला मुंबई पोलिसांचा विरोध -खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी राज्य सरकार विरोधात राज्यात असंतोष निर्माण करत राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करत सरकार बरखस्त करण्याची कट राणा दाम्पत्याने रचला होता, अशी माहिती आज जामीन अर्जावर उत्तर देताना मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळेच राणा दाम्पत्यांच्या विरोधात राज्यद्रोहचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जाला मुंबई पोलिसांकडून विरोध करण्यात आला असून आज सरकारी वकील प्रदीप घरात यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर दिलेल्या उत्तरात गंभीर आरोप केले आहेत.

वाद कसा सुरू झाला? - मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशीदीवरील भोंगे काढण्यात यावे, अन्यथा 3 मे पासून मशीदीसमोर हनुमान चालीसा पठण ( Hanuman Chalisa Recitation ) सुरू करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यामुळे राज्यभरातून या प्रकरणावर प्रतिक्रिया उमटल्या. राज ठाकरे यांना हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन राजकारण करायचे असल्याची टीका राजकीय नेत्यांनी सुरू केली. संजय राऊत, शरद पवार यांनीही याप्रकरणी राज ठाकरेंच्या या भूमीकेवर जहरी टीका केली. महाविकास आघाडी, मनसे आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होत असताना अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी 16 एप्रिलला या वादात उडी घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पदावर आल्यापासून महाराष्ट्राला साडेसाती लागली ( Ravi Rana Criticized CM Thackeray ) आहे. महाराष्ट्राची ही साडेसाती दूर व्हावी, यासाठी मुख्यमंत्री ठाकरेंनी 'मातोश्री'वर हनुमान चालीसा पठण ( Hanuman Chalisa Recitation ) करावे, असे आवाहन आमदार रवी राणा यांनी केले. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले. शिवसैनिकांनी राणांच्या घरी हनुमान चालीसा पठण केले. यावर राणा यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान 'मातोश्री' बाहेर आपण 23 तारखेला हनुमान चालिसा पठण करण्यासाठी जात असल्याची घोषणा केली आणि वादाला तोंड फुटले. राणा दाम्पत्याला अमरावतीतच अडवण्याचा प्रयत्न होणार होता, त्यामुळे त्यांनी गनिमीकावा करत एक दिवस आधीच मुंबई गाठली, 23 एप्रिलला शिवसैनिकांनी राणांच्या मुंबईतील घरावर हल्ला केला.

हेही वाचा -Sharad Pawar Replied To Raj Thackeray : '...म्हणून शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेतो', शरद पवारांचे प्रत्युत्तर

Last Updated : Apr 30, 2022, 6:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details