'त्या' शाळांची एनओसी रद्द करण्याचा सरकारचा निर्णय निव्वळ धूळफेक - अतुल भातखळकर - आमदार अतूल भातखळकर
कोरोनाच्या काळात भरमसाठ फी वाढ करणाऱ्या, पालकांकडे फी करिता तगादा लावणार्या व फी अदा न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे निकाल रोखून धरणार्या मुंबई-नवी मुंबईतील आठ शाळांची एनओसी रद्द करण्याचा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा निर्णय निव्वळ धूळफेक करणारा असल्याची टीका भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
!['त्या' शाळांची एनओसी रद्द करण्याचा सरकारचा निर्णय निव्वळ धूळफेक - अतुल भातखळकर mla Atul Bhatkhalkar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12404843-100-12404843-1625823113239.jpg)
मुंबई -कोरोनाच्या काळात भरमसाठ फी वाढ करणाऱ्या, पालकांकडे फी करिता तगादा लावणार्या व फी अदा न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे निकाल रोखून धरणार्या मुंबई-नवी मुंबईतील आठ शाळांची एनओसी रद्द करण्याचा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा निर्णय निव्वळ धूळफेक करणारा असल्याची टीका भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. सरकारने पालकांची फसवणूक केली असून शालेय शिक्षणमंत्र्यांनी कायद्यात सुधारणा करून फी मध्ये 50 टक्के सवलत देत राज्यातील पालकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही अतुल भातखळकर यांनी केली आहे.