मुंबई - मुंबईत दोन वर्षे कोरोना विषाणू प्रसारामुळे दहीहंडीसह इतर सण साजरे करण्यात आले नव्हते. यंदा कोरोना विषाणूचा प्रसार कमी झाल्याने दहीहंडी Dahi Handi Mumbai हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. हा सण साजरा करण्यासाठी थर लावताना दुपारी ३ वाजेपर्यंत २४ गोविंदा जखमी झाले आहेत. या गोविदांची रुग्णालयात गैरसोय होऊ नये, म्हणून मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर Former Mayor Kishori Pednekar यांनी धाव घेतली आहे.
२४ गोविंदा जखमी :मुंबईत १५०० हून अधिक मंडळे आहेत. ही मंडळे मुंबईत सर्वत्र फिरून राजकीय पक्ष, नेते, संस्था यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीला भेट देवून उंच थर लावून सलामी देणे, दहीहंडी फोडत असतात. या बदल्यात या मंडळांना आयोजन कर्त्यांकडून रोख बक्षिसे दिली जातात. जास्तीत जास्त बक्षिसे मिळवण्याचा प्रयत्न मंडळांचा असतो. याच दरम्यान दहीहंडीसाठी थर लावताना मुंबईत दुपारी ३ पर्यंत त्यामध्ये वाढ होऊन २४ गोविंदा जखमी झाले. त्यांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकूण २४ पैकी १९ जणांवर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ५ जण रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र दुपारनंतर उत्सवाला गोविदांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. यामुळे जखमी होणाऱ्या गोविंदाचे प्रमाण वाढू लागले आहे.