मुंबई - अली अब्बास जफरची नुकतीच रिलीज झालेली वेब सिरीज तांडवमुळे बरीच खळबळ उडाली आहे. या मालिकेसंदर्भात बरेच वाद उद्भवले आहेत आणि काही ठिकाणी एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे.
उत्तर प्रदेशातील तांडवविरोधातील एफआयआरमध्ये अलीकडेच उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. अनिल कुमार सिंग आणि दयाशंकर दुबे हे मुंबई पोलिसांची परवानगी घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत आहेत. तांडव वेब सिरीजबाबत मुंबईच्या घाटकोपर पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदविण्यात आला आहे. निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांविरूद्ध आयपीसी कलम 153 (ए) 295 (ए) 505 आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ॉ
'तांडव' निर्मात्यांविरोधात मुंबईत एफआयआर दाखल - तांडव वेब सीरिज
अली अब्बास जफरची नुकतीच रिलीज झालेली वेब सिरीज तांडवमुळे बरीच खळबळ उडाली आहे. या मालिकेसंदर्भात बरेच वाद उद्भवले आहेत आणि काही ठिकाणी एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. तांडव वेब सिरीजबाबत मुंबईच्या घाटकोपर पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदविण्यात आला आहे.
!['तांडव' निर्मात्यांविरोधात मुंबईत एफआयआर दाखल FIR filed against 'Tandav](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10318504-2-10318504-1611171465640.jpg)
FIR filed against 'Tandav
धार्मिक भावना दुखावणे योग्य नाही. त्याचबरोबर, त्यांनी असेही म्हटले आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यावरच निष्कर्ष गाठला जाईल. वेगवेगळ्या ठिकाणी एफआयआर दाखल झाला आहे आणि त्या एफआयआरमध्ये काही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आमचे पोलिस या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गेले आहेत. कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पण कोणालाही भावनांशी खेळू दिले जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत, आमची टीम तपास करत आहे आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन अहवाल देईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.