मुंबई -देवेंद्र फडणवीस यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून महाराष्ट्राबद्दल खोटी बातमी पसरवण्याचे काम केले आहे. जगभर महाविकास आघाडी सरकारच्या कामाची प्रशंसा केली जात आहे. मात्र हे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पचणी पडत नसल्याने, त्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिल्याचा आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
कोरोनाबाबत गंभीरतेने राज्य सरकार काम करत आहे. कोरोना पॉझिटिव्हचा आकडा आणि मृतांचा आकडा लपवला जात नाही. राज्यात ६ हजार २०० लॅब तयार करण्यात आले आहेत. कोरोना निदानासाठी आरटीपीसीआर चाचण्यांवर भर देण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टाने देखील राज्य सरकारचे कौतुक केले आहे. हे देवेंद्र फडणवीस यांना पचत नसल्यामुळेच त्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिल्याची टीका मलिक यांनी केली आहे.