महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुख्यमंत्र्यांशी झाली चर्चा; आम्ही सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत : मंत्री बाळासाहेब थोरात

शिवसेनेचे नेते मंत्री एकनाथ शिंदे ( Minister Eknath Shinde revolt ) यांनी पुकारलेल्या बंडानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून ( Turmoil in Maharastra politics ) निघाले आहे. त्यांच्या बंडानंतर सरकार अल्पमतात येऊ शकते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात कमालीची चिंता ( Extreme anxiety ) आहे. याच पार्श्वभूमीवर काॅंग्रेस आमदारांची महत्त्वाची बेठक ( IMP Meeting of Congress MLA ) मंत्री बाळासाहेब थोरात ( Minister Balasaheb Thorat ) यांच्या निवासस्थानी घेण्यात आली. या बैठकीला काॅंग्रेसचे महत्त्वाचे मंत्री, नेते, आमदार उपस्थित होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना थोरात यांनी माहिती दिली.

By

Published : Jun 21, 2022, 3:52 PM IST

Minister Balasaheb Thorat
मंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई : शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर ( Minister Eknath Shinde revolt ) राजकीय वातावरणात खळबळ ( Turmoil in Maharastra politics ) माजली आहे. या कारणास्तव महाविकास आघाडीच्या गोटात कमालीची चिंता पसरली आहे. काँग्रेसने आपल्या आमदारांची महत्त्वाची बैठक मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी घेतली. बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मंत्री अशोक चव्हाण, मंत्री अमित देशमुख, मंत्री यशोमती ठाकूर, पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. या बैठकीनंतर बोलताना थोरात यांनी सध्याच्या सर्व घडामोडींवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत, तसेच गरज पडली तर तिन्ही पक्ष एकत्र चर्चा करू, असे सांगितले आहे.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

काय म्हणाले थोरात : महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन वातावरण निर्माण झाले आहे. ही वस्तुस्थिती आहे. आम्ही महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र काम करीत आहोत. एक वेगळं वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, या सर्व परिस्थितीवर आम्ही लक्ष देऊन आहोत. माननीय मुख्यमंत्री यांच्याशीसुद्धा चर्चा झालेली आहे. ज्या गोष्टी आम्हाला न्यूज चॅनलकडून समजल्या आहेत, त्याच गोष्टी त्यांना समजल्या आहेत. याविषयी आम्हाला काही माहिती नाही. गरज वाटली तर आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसून यावर चर्चा करू. पण, सध्या तरी तशी परिस्थिती नाही आहे.

काॅंग्रेसच्या वरिष्ठांशी चर्चा : काँग्रेस हायकमांडबरोबर आम्ही नेहमी संपर्कात आहोत. एच. के. पाटील आमचे प्रभारी यांच्याशी बोलणं झालेले आहे. गरज वाटली तर ते सर्व आमदारांची प्रत्यक्षात बोलतील. त्याचप्रमाणे आमचे नेते कमळनाथ जी हे उद्या मुंबईत येणार आहेत. त्यांच्याशी चर्चा होईल.

मी आता आढावा घेणार आहे : पृथ्वीराज चव्हाण
या बैठकीनंतर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, शिवसेनेचे काय झालं मला माहिती नाही. काल विधान परिषद निवडणुकीत जो प्रकार घडला अत्यंत दुर्दैवी आहे. आम्हाला विजयाची खात्री होती. या सगळ्याचं विश्लेषण मी करणार आहे. आमची चिंता आहे की, आमच्या पक्षात जो प्रकार घडला तो का घडला? याचा आढावा मी आता घेणार आहे. महाविकास आघाडी सरकार फुटणार नाही. नेमकं काय घडलं त्याची चर्चा आम्ही आज करणार आहोत. सर्व आमदारांना मुंबईत राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.

अजून अधिकृत काहीच नाही : चव्हाण
अशोक चव्हाण म्हणाले की, आज रात्रीपर्यंत सर्वांना मुंबईत बोलवले आहे. उद्या परत बैठक होणार आहे. प्रभारी एच. के. पाटील मुंबईत येणार व आमदारांशी वन ऑन वन बैठक होणार आहे. शिवसेनेची अंतर्गत गोष्ट आहे. याबाबत मुख्यमंत्री त्यांच्याशी चर्चा करतील. या सर्व ऐकलेल्या गोष्टी आहेत. अजून अधिकृत काहीही आलेले नाही. काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांच्या समवेत काँग्रेस आमदारांची बैठक घेणार आहोत. दिल्लीतील नेतेदेखील आज येणार आणि त्यानंतर सर्व आमदार आणि नेत्यांची बैठक होणार आहे.

हेही वाचा :Eknath Shinde Latest News : नाराजीचा विस्फोट; ठाकरे सरकार व्हेंटिलेटरवर

ABOUT THE AUTHOR

...view details