मुंबई -एकीकडे संपावर गेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर (ST Worker Strike) कारवाई सुरू आहे. तर दुसरीकडे आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने खात्याअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या बढतीसाठी परीक्षा (ST Workers Promotion Exam) घेण्याचा घाट घातला आहे. महामंडळातील वरिष्ठ लिपिक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक व वाहतूक नियंत्रक या संवर्गाच्या खात्यांतर्गत बढती लेखी परीक्षा २६ डिसेंबर २०२१ रोजी घेण्याची घोषणा (Departmental promotion examination in ST ) केली आहे. यामुळे एसटी महामंडळातील शेकडो कर्मचारी या बढती परीक्षांपासून वंचित राहणार आहे.
ST Workers Promotion Exam : संप मोडीत काढण्यासाठी खात्याअंतर्गत बढती परीक्षेचा घाट; हजारो कर्मचारी परीक्षेस मुकणार ? - Departmental promotion examination in ST
राज्यात गेल्या जवळपास दीड महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एकीकडे संपावर गेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर (ST Worker Strike) कारवाई सुरू आहे. तर दुसरीकडे आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने खात्याअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या बढतीसाठी परीक्षा (ST Workers Promotion Exam) घेण्याचा घाट घातला आहे. महामंडळातील वरिष्ठ लिपिक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक व वाहतूक नियंत्रक या संवर्गाच्या खात्यांतर्गत बढती लेखी परीक्षा २६ डिसेंबर २०२१ रोजी घेण्याची घोषणा केली आहे. यामुळे एसटी महामंडळातील शेकडो कर्मचारी या बढती परीक्षांपासून वंचित राहणार आहे.
हजारो एसटी कर्मचाऱ्यांचे नुकसान -
गेल्या एका महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. अनेकदा कामावर हजर होण्याचे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून करण्यात आले आहे. मात्र, कर्मचारी संपावर ठाम असल्याने महामंडळाचे मोठे नुकसान होत आहे. हा संप मोडून काढण्यासाठी प्रशासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यत एसटी महामंडळाने १० हजारापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तर दोन हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा बदल्या केल्या आहे. तरी ही एसटी कामगारांचा संप मोडून काढण्यात महामंडळाला अपयश येत आहे. आता तर चक्क एसटी महामंडळाने महामंडळातील वरिष्ठ लिपिक, सहाय्यक वाहतूक निरिक्षक व वाहतूक नियंत्रक या संवर्गाच्या खात्यांतर्गत बढती लेखी परीक्षा (Departmental promotion examination in ST ) घेण्याचा घाट महामंडळाने घातला आहे. परीक्षा घेण्याबाबत महामंडळाने परिपत्रक सुद्धा काढले आहे. जर एसटी कर्मचारी परीक्षेला हजर झाले नाही, तर हजारों कर्मचाऱ्यांचे नुकसान होणार आहे.