महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अन्य राज्यातून महाराष्ट्राला 500 मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवण्याची मागणी - आरोग्य मंत्री राजेश टोपे लेटेस्ट न्यूज

राज्यात सध्या १२५० मेट्रीक टन ऑक्सिजन उत्पादीत होत असून, परराज्यातून सुमारे ३०० मेट्रीक ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. सध्याची वाढती मागणी लक्षात घेता, अन्य राज्यांमधून सुमारे ५०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जावा, अशी मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मुंबईमध्ये सांगितले.

अन्य राज्यातून महाराष्ट्राला 500 मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवण्याची मागणी
अन्य राज्यातून महाराष्ट्राला 500 मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवण्याची मागणी

By

Published : Apr 21, 2021, 7:53 PM IST

मुंबई-राज्यात सध्या १२५० मेट्रीक टन ऑक्सिजन उत्पादीत होत असून, परराज्यातून सुमारे ३०० मेट्रीक ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. सध्याची वाढती मागणी लक्षात घेता, अन्य राज्यांमधून सुमारे ५०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जावा, अशी मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मुंबईमध्ये सांगितले.

पाचशे मेट्रिक टन ऑक्सिजनची केंद्राकडून मागणी

राज्यात सध्या ६ लाख ८५ हजार सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील सुमारे १० ते १५ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासू शकते असा अंदाज आहे. राज्यात सध्या १२५० मेट्रीक टन ऑक्सिजन उत्पादीत हेत असून, तो पूर्णपणे वैद्यकीय कराणासाठी वापरण्यात येत आहे. त्याशिवाय जामनगर, भिलाई आणि भिल्लारी येथून सुमारे ३०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा महाराष्ट्राला केला जात आहे. त्यात अजून वाढ करून ५०० मेट्रीक टन ऑक्सिजन पुरविण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. राज्यात अशा पद्धतीने एकूण १५५० मेट्रीक टन ऑक्सिजनचा वापर केला जात आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली त्याचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली.

अन्य राज्यातून महाराष्ट्राला 500 मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवण्याची मागणी

केंद्र शासन 50 हजार मेट्रीक टन ऑक्सिजन आयात करणार

केंद्र शासन देखील सुमारे ५० हजार मेट्रीक टन ऑक्सिजन आयात करणार असून, त्यामाध्यमातूनही राज्याला ऑक्सिजन मिळण्याची शक्यता आरोग्यमंत्र्यांनी वर्तविली आहे. राज्यात सहा ठिकाणं अशी आहेत, जेथे ऑक्सिजनचे उत्पादन केले जाते. मात्र त्याठिकाणी बॉटलिंग प्लांटची सुविधा नसल्याने त्याची वाहतुक करता येत नाही. त्यामुळे या सहा ठिकाणी ५०० बेडची सुविधा असलेले तात्पुरते रुग्णालय उभारण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

'या' सहा ठिकाणी रुग्णालये उभारण्याचे नियोजन

पेण (जेएसडब्ल्यू), थळ (आर सी एफ), वर्धा (लॉइड स्टील), औष्णिक विद्युत प्रकल्प असलेले खापरखेडा, पारस, परळी अशा सहा ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती होत असून, त्याची शुद्धता ९८ टक्के असल्यामुळे या ऑक्सिजनचा उपयोग रुग्णांना होऊ शकतो. या सहा ठिकाणी प्रत्येकी ५०० खाटांचे रुग्णालय निर्माण करून रुग्णांना ऑक्सिजन देण्याचे नियोजन आहे. त्याची निर्मिती झाल्यावर राज्यात सुमारे ३००० खाटांची भर पडणार असल्याचेही यावेळी राजेश टोपे यांनी सांगितले.

लसीकरणावर भर

राज्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणावर भर देण्यात येणार असून, त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी दिल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. सिरम इन्स्टीट्युट सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयांना प्रति डोस ४०० तर खासगी रुग्णालयांना ६०० रुपये प्रमाणे दर आकारणार आहे. जागतिकस्तरावर अमेरिकेच्या लसीची किंमत १५००, रशिया आणि चीनच्या लसीची किंमत प्रत्येकी ७५० रुपये असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच येणाऱ्या काळात राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितले.

हेही वाचा -महाराष्ट्राला लवकरच रोज १ लाख रेमडेसिवीरचा पुरवठा होईल - राजेंद्र शिंगणे

ABOUT THE AUTHOR

...view details