महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Corporation School : महापालिका शाळांमधून गीता पठन करा, भाजपाच्या मागणीमुळे रंगणार राजकीय वाद

बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळांमधून भगवद्‍गीता पठन ( Read Bhagwat Geeta In School ) करावे. जेणेकरुन मुलांवर चांगले संस्कार होती, अशी मागणी भाजपा नगरसेवक योगिता कोळी यांनी केली ( Bjp Corporator Demand Read Bhagwat Geeta ) आहे.

By

Published : Feb 17, 2022, 6:53 PM IST

योगिता कोळी
योगिता कोळी

मुंबई - भगवद्‍गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान विषयक ग्रंथ आहे. गीतेला 'मोक्षशास्त्र' म्हणले गेले आहे. यासाठी महापालिकेच्या शाळांमधून भगवद्‍गीता पठन करावे, अशी मागणी भाजपा नगरसेविकेने महापालिका सभागृहकडे ( Teach Bhagwat Geeta In Mumbai School ) केली आहे. तसा प्रस्ताव महानगरपालिकेच्या येत्या सभेमध्ये मांडला जाणार आहे. ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाकडून हिंदुत्वाचे कार्ड खेळले जात आहे. त्यांच्या नगरसेविकेकडून करण्यात आलेल्या या मागणीमुळे येत्या काळात भाजपा विरुद्ध इतर पक्ष, असा राजकीय वाद रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

योगिता कोळी यांच्या मागणीचे पत्र

ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो

याबाबत बोलताना भाजपा नगरसेविका योगिता कोळी म्हणाल्या की, भगवद्‌गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान विषयक ग्रंथ आहे. तसेच हा ग्रंथ वेदांच्या अखेरच्या रचनेतील 'गीतोपनिषद' म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे. ५००० वर्षांपूर्वी २५ डिसेंबर ह्या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. भारतीय या ग्रंथाला पवित्र धर्मग्रंथ समजतात. त्यामुळे न्यायालयात गीतेवर हात ठेवून शपथ घेण्याची प्रथा पडली आहे. भगवद्‍गीता हा हिंदुस्थानातला महत्त्वाचा व मानवी इतिहासातल्या ग्रंथांपैकी अतिशय तत्त्वज्ञानावर आधारलेला संदर्भग्रंथ आहे.

नगरसेविका योगिता कोळी प्रतिक्रिया

गीतेला 'मोक्षशास्त्र' म्हणले गेले आहे

जगातील विविध देशांतले व विविध धर्मांतले असंख्य तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी या ग्रंथाबद्दल कायमच गौरवोद्गार काढले आहेत. मानवी जीवनाच्या अथांग सागरामधे गीतेला दीपस्तंभाचे स्थान दिले आहे. गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान आणि आनंद मिळतो व त्याचप्रमाणे मोक्षाचा मार्ग सापडण्यास मदत होते, म्हणून गीतेला 'मोक्षशास्त्र' म्हणले गेले आहे. तरी ही वस्तुस्थिती लक्षात घेता बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळांमधून भगवद्‍गीता पठन केले जावे. जेणेकरून भावी पिढीवर योग्यप्रकारचे संस्कार होतील. महापालिकेच्या शाळांमधून भगवद्‌गीता पठन करावे. या मागणीचा विचार करून अहवाल सादर करण्याची आयुक्तांना विनंती करण्यात यावी. सदर ठरावाची सूचना अंतिम निकाली लागेपर्यंत महानगरपालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेवर समाविष्ट करण्यात यावा, अशी मागणीही योगिता कोळी यांनी केली आहे.

हेही वाचा -Bail Granted To Hindustani Bhau: हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठकला मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

ABOUT THE AUTHOR

...view details