महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईतील 50 वर्षांवरील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा 6 हजार पार - मुंबई कोरोना मृत्यूदर

एकूण मृत्यूच्या 83 टक्के मृत्यू हे 50 वर्षांवरील रुग्णांचे झाले आहेत. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेने ज्येष्ठांच्या मृत्यूदरावर नियंत्रण आणण्यासाठी कडक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई
मुंबई

By

Published : Aug 21, 2020, 11:41 AM IST

मुंबई - शहरातील रुग्ण दुपटीचा आणि रुग्ण बरे होण्याचा दर दिलासादायक आहे. मात्र, मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांना असलेला कोरोनाचा धोका काही केल्या कमी होताना दिसत नाही. मुंबईतील 50 वर्षांवरील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा आता सहा हजारांच्या वर गेला आहे. एकूण मृत्यूच्या 83 टक्के मृत्यू हे 50 वर्षांवरील रुग्णांचे झाले आहेत. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेने ज्येष्ठांच्या मृत्यूदरावर नियंत्रण आणण्यासाठी कडक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.

मृत्यूदर
ज्येष्ठांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. मात्र, तरीही त्यांची योग्य ती काळजी घेतली न गेल्याने या वर्गातील लोकांना मोठ्या संख्येने कोरोनाची लागण होत आहे. आज घडीला एकूण रुग्णांच्या 43 टक्के रुग्ण हे 50 वर्षांवरील आहेत. त्याचवेळी पालिकेच्या आकडेवारीनुसार, 19 ऑगस्टपर्यंत मुंबईत 7,265 मृत्यू झाले आहेत. त्यातील 83 टक्के मृत्यू हे 50 ते 100 वयोगटातील अर्थात ज्येष्ठांचे आहेत. त्यामुळे ज्येष्ठांचे आरोग्य सांभाळण्यासाठी कष्ट घ्यावे लागणार आहेत. 50 ते 60 वयोगटातील रुग्णांचा आकडा 25 हजार 542 असा असून यातील 1,784 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 60 ते 70 वयोगटातील 17 हजार 800 रुग्ण असून यातील 2,085 रुग्ण दगावले आहेत. 70 ते 80 वयोगटातील रुग्णांचा आकडा 9 हजार 121 असून यात 1,448 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 80 ते 90 वयोगटातील रुग्ण 3 हजार असून यातील 639 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 90 ते 100 वयोगटातील 330 रुग्ण असून यातील 68 रुग्ण दगावले आहेत.

हेही वाचा -सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : सुशांतचा स्वयंपाकी नीरजची सीबीआय चौकशी सुरू

7,265 पैकी 1,240 मृत्यू हे 0 ते 50 वयोगटातील असून याची टक्केवारी 17 टक्के आहे. पण, 50 ते 100 वयोगटातील मृत्यू चिंताजनक आहेत. त्यामुळे आता पालिकेने 50 वर्षांपुढील नागरिकांसाठीना होम क्वारंटाइनची परवानगी देण्याचा निर्णय रद्द केला आहे. आता लक्षणे असो वा नसो 50 वर्षांपुढील रुग्णांना रुग्णालयांमध्ये दाखल व्हावे लागणार आहे. तर इतरही उपाययोजना आता पालिकेकडून करण्यात येणार आहेत.

हेही वाचा -मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा धरणही 'ओव्हरफ्लो', सातपैकी चार धरणे भरली

ABOUT THE AUTHOR

...view details