महाराष्ट्र

maharashtra

Crisis of water scarcity : राज्यात टँकरची संख्या वाढली; पाणी टंचाईचे सावट अधिक गडद

By

Published : May 24, 2022, 2:30 PM IST

तीव्र पाणी टंचाईमुळे नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. यावेळी राज्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 455 गावे आणि 1081 वाड्यांवर टॅंकर धावत आहेत. भाजपातर्फे नुकताच "जल आक्रोश" मोर्चा काढण्यात आला.

Water by tanker
टॅंकरद्वारे पाणी

मुंबई : गतवर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात अधिक टँकर धावू लागले आहेत. ( The number of tankers increased in the state ) मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुमारे ४५५ गावे आणि १०८१ वाड्यांवर टँकर राज्यात धावत आहेत. यामुळे पाणी टंचाईचे संकट अधिक तीव्र ( Severe water scarcity ) झाले असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.

तीव्र पाणीटंचाई : राज्यातील पाणीटंचाई अधिक तीव्र होऊ लागल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पाणीटंचाईच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने औरंगाबादमध्ये नुकताच "जल आक्रोश" मोर्चा काढण्यात आला. ( Jal Akrosh March in Aurangabad ) मराठवाड्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणीटंचाई तीव्र होत असल्याचे दिसते आहे. मात्र, त्यापाठोपाठ पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातही वाड्यावस्त्यांवर टँकर धावू लागले आहेत.

मराठवाड्यातील स्थिती : मराठवाड्यातील ४३ गावांमध्ये आणि २३ वाड्यांमध्ये सोळा शासकीय, तर ४३ खासगी टँकर पाणीपुरवठा करीत आहेत. मराठवाड्यात एकूण ५९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गतवर्षी याच दिवशी मराठवाड्यात ६७ गावे आणि २४ वाड्यांमध्ये ५८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अवर सचिव वर्षा देशमुख यांनी दिली.


उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक टँकर : उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये ११७ गावे आणि ११९ वाड्यांवर ४५ शासकीय आणि ५७ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, १०२ टँकरद्वारे जनतेला पाणी दिले जात आहे. गतवर्षी याच दिवशी उत्तर महाराष्ट्रात ९१ गावे आणि १०८ वाड्यांमध्ये ७० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता.


कोकणातही टँकरद्वारे पाणीपुरवठा : कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर या चार जिल्ह्यांमध्ये एकूण १५५ गावे आणि ४९९ वाड्यांवरती तीन शासकीय आणि ९८ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, १०१ टँकर कोकणात पाणीपुरवठ्यासाठी फिरत आहेत. कोकणात गतवर्षी १९४ गावे आणि ५०७ वाड्यांमध्ये ११६ टँकरद्वारे याच दिवशी पाणीपुरवठा केला जात होता. पुणे आणि सातारा जिल्ह्यांतही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून, ७१ गावे आणि ३६० वाड्यांवरती २५ शासकीय आणि ४५ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो आहे. गतवर्षी याच दिवशी ५५ गावे आणि १९८ वाड्यांमध्ये ५६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता.


पश्चिम विदर्भात टँकर, तर पूर्व विदर्भ टँकरमुक्त :पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, ६९ गावांमध्ये ६९ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो आहे. मात्र, पूर्व विदर्भात एकही टँकर सुरू नसून, अद्याप टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरज निर्माण झालेली नाही. गतवर्षी याच दिवशी पूर्व विदर्भात १५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता, अशी माहितीही देशमुख यांनी दिली.

राज्यात सुरू असलेला पाणी पुरवठा : राज्यात सध्या ४५५ गावे आणि १०८१ वाड्यांवर ८९ शासकीय आणि ३१२ खासगी टँकर्सद्वारे म्हणजेच एकूण ४०१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो आहे. गतवर्षी याच दिवशी ४९७ गावांमध्ये आणि ८३७ वाड्यांमध्ये ३८८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता, असेही देशमुख यांनी सांगितले.

हेही वाचा :No Water Scarcity In Marathwada : मराठवाड्यात यंदा पाण्याची टंचाई जाणवणार नाही, कारण....

ABOUT THE AUTHOR

...view details