महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सरकारचा 'हा' निर्णय लागू होण्यापूर्वीच मंत्रालयात शुकशुकाट - world health emergency

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ५२ वर जाऊन पोहोचली आहे. यानंतर राज्य सरकारने सर्व सरकारी कार्यालयामंध्ये आता २५ टक्केच उपस्थिती ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. उद्यापासून पुढे दोन दिवस सरकारी सुट्टया आल्याने निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून होईल.

सरकारचा 'हा' निर्णय लागू होण्यापूर्वीच मंत्रालयात शुकशुकाट
सरकारचा 'हा' निर्णय लागू होण्यापूर्वीच मंत्रालयात शुकशुकाट

By

Published : Mar 20, 2020, 9:55 PM IST

Updated : Mar 20, 2020, 10:02 PM IST

मुंबई -कोरोना विषाणूचा राज्यात प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने राज्यातील सर्व सरकारी कार्यालयामंध्ये आता २५ टक्केच उपस्थिती ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याच पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात सरकारच्या निर्णयानंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लवकरच घर गाठल्याने सर्वत्र शुकशुकाट झाल्याचे पहावयास मिळाले. निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून होणार आहे. याआधी ५० टक्के जणांनी उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला होता.

सरकारचा 'हा' निर्णय लागू होण्यापूर्वीच मंत्रालयात शुकशुकाट

राज्यात आज दुपारपर्यंत आणखी चार कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ५२ वर जाऊन पोहोचली आहे. यानंतर राज्य सरकारने सर्व सरकारी कार्यालयामंध्ये आता २५ टक्केच उपस्थिती ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. याआधी सरकारने राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांची केवळ ५० टक्केच उपस्थिती ठेवण्याचा निर्णय घेतला होता. उद्यापासून पुढे दोन दिवस सरकारी सुट्टया आल्याने या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून होणार आहे.

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना सुरू केलेल्या असतानाच आज शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. तर, दुसरीकडे नववी आणि अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची मुभाही दिली आहे.

हेही वाचा - #CORONA : 'त्या' तिघांची कोरोना चाचणी निगेटिव्ह

हेही वाचा - कोरोना इफेक्ट : १ ली ते ८ वीच्या परीक्षा रद्द, दहावीचे दोन पेपर वेळापत्रकानुसारच - वर्षा गायकवाड

Last Updated : Mar 20, 2020, 10:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details