महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 6, 2021, 8:20 PM IST

ETV Bharat / city

CoronaVirus : राज्यात सोमवारी ५ हजार ९८८ कोरोनामुक्त तर ३,६२६ नवे रुग्ण, ३७ मृत्यू

राज्यात आज दिवसभरात ३ हजार ६३६ नवीन करोनाबाधित आढळले असून, ५ हजार ९८८ जण करोनामधून बरे झाले आहेत. याचबरोबर, ३७ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

corona update Maharashtra
corona update Maharashtra

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रोज तीन ते चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. आज सोमवारी ६ सप्टेंबर रोजी ३,६२६ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातून आज ५,९८८ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०९ टक्के इतका असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात ४७,६९५ सक्रिय रुग्ण -

राज्यात ५९८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,००,७५५ कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०९ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ५,९८८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ३७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३७,८११ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ४९ लाख ९९ हजार ४७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ८९ हजार ८०० (११.८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ३ हजार १६९ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ४७,६९५ सक्रिय रुग्ण आहेत.

हे ही वाचा -पुण्यात अल्पवयीन मुलीवर ७ जणांचा सामूहिक बलात्कार, आरोपींमध्ये २ रेल्वे कर्मचारी आणि रिक्षाचालक

रुग्णसंख्येत चढउतार -

गुरुवारी २६ ऑगस्टला ५१०८, शुक्रवारी २७ ऑगस्टला ४६५४, शनिवारी २८ ऑगस्टला ४८३१, रविवारी २९ ऑगस्टला ४,६६६ तर सोमवारी ३० ऑगस्टला ३,७४१, मंगळवारी ३१ ऑगस्टला ४१९६, १ सप्टेंबरला ४४५६, २ सप्टेंबरला ४३४२, ३ सप्टेंबरला ४३१३, ४ सप्टेंबरला ४१३०, ५ सप्टेंबरला ४०५७, ६ सप्टेंबरला ३६२६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या महिनाभरात रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहेत.

हे ही वाचा -Belgaum Corporation Results : बेळगाव महापालिकेत फुललं 'कमळ'.. भाजपला स्पष्ट बहुमत, 'एकीकरण'ला धक्का

मृत्यूदर २.१२ टक्के -

१९ जुलैला ६६, २४ जुलैला २२४, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, ९ ऑगस्टला ६८, १२ ऑगस्टला २०८, २५ ऑगस्टला २१६, ३० ऑगस्टला ५२, ३१ ऑगस्टला १०४, १ सप्टेंबरला १८३, २ सप्टेंबरला ५५, ३ सप्टेंबरला ९२, ४ सप्टेंबरला ६४, ५ सप्टेंबरला ६७, ६ सप्टेंबरला ३७ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात २.१२ टक्के इतका मृत्युदर नोंदवण्यात आला आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण -

  • मुंबई - ३८३
  • ठाणे पालिका - ५२
  • नवी मुंबई पालिका - ५५
  • कल्याण डोबिवली पालिका - ३७
  • रायगड - ४३
  • पनवेल पालिका - ४२
  • अहमदनगर - ८०५
  • पुणे - ४१६
  • पुणे पालिका - १९८
  • पिपरी चिंचवड पालिका - १३३
  • सोलापूर - २२८
  • सातारा - २८८
  • कोल्हापूर - ७२
  • सांगली - २२०
  • सांगली मिरज कुपवाडा पालिका - ५३
  • रत्नागिरी - ११८
  • उस्मानाबाद - ३५
  • बीड - ४८

ABOUT THE AUTHOR

...view details