मुंबई - महिलांच्या विकासाला बळ देण्याची आवश्यकता आहे. महिला विकासाच्या योजना कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरणे गरजेचे आहे. यामध्ये लक्ष देण्याची आपली भूमिका आहे. महिलांचे प्रश्न आणि समस्या तसेच त्यांच्यासाठीच्या योजनांना गती देणे. सध्याच्या योजनांतील अडचणी दूर करणे, नवीन योजना आखणे यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष राहील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीस मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) अध्यक्षा ज्योती ठाकरे, जल जीवन मिशनच्या संचालक आर विमला, माविमच्या महाव्यवस्थापक कुसुम बाळसराफ, माजी महापौर विशाखा राऊत, गीता कांबळी, संगीता हसनाळे, रंजना मेवाळकर उपस्थित होते.
बाजारपेठेच्या मागणीनुसार उत्पादननिर्मिती -
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, महिलांनी आता बचत गट आणि त्यांची पारंपरिक पापड, मसाले आदी उत्पादने याच्यापलिकडे जाऊन नवीन संधी शोधल्या पाहिजेत. महिलांच्या जीवनमानात बदल होण्यासाठी उद्योगशीलतेत वाढ करत ‘विकेल ते पिकेल’ या धर्तीवर आधुनिक बाजारपेठेच्या मागणीशी उत्पादननिर्मितीची सांगड घालावी लागेल. त्यासाठी माविम, उमेदच्या (राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान) उपक्रमांना व्यापक स्वरुप देत महिलांच्या प्रशिक्षण आणि क्षमताबांधणीचे कार्यक्रम अधिक गतीने हाती घ्यावे लागतील, असेही ते म्हणाले.
ऑनलाईन विक्री प्लॅटफॉर्म -