महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

राज्यातील काही भागात अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, तेथे तत्काळ पंचनामे करून मदत देण्याबाबतचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.

By

Published : Oct 29, 2019, 10:05 AM IST

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई -राज्यातील काही भागात अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, तेथे तत्काळ पंचनामे करून मदत देण्याबाबतचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.

राज्याच्या काही भागात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाले असताना सत्तेच्या बाजारात टीका-टिप्पनी सुरू आहे. अतिवृष्टीकडील दुर्लक्षानंतर बाधित क्षेत्रात तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.

हेही वाचा.... राज्यात सत्ता स्थापनेसाठी दबावतंत्र, रावतेंनंतर मुख्यमंत्र्यांनीही घेतली राज्यपालांची भेट

राज्यातील शेतकऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत शासनाने मदत करण्यसाठी निर्देश दिले आहेत. सध्या बऱ्याच भागात विविध पिकांच्या काढण्या सुरू आहेत. मात्र, राज्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नुकसानीचे पंचनामे त्वरित करणे गरजेचे असून तसे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज मंगळवारी दिले आहेत.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details