मुंबई - राज्यात वातावरणामध्ये बदल झाला आहे. कमी दाबाचे पट्टे आणि हवेत चक्रीय स्थितीमुळे राज्याच्या सर्वच भागात आठवडाभर पावसाळी वातावरण राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, मुंबईतील तापमान वाढ होणार असल्याने मुंबईकरांना चटके सहन करावे लागणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
पुढील आठवडाभर राहणार ही परिस्थिती -
काही दिवसात तापमानातदेखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. यामुळे नागरिकांना उकड्याचा सामना करावा लागत आहे. दोन दिवस मुंबई भागात आणखीन तापमान वाढेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दक्षिणपासून मध्य प्रदेश या भागात कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत. यामुळे हवेचे चक्रे स्थितीत बदल झाला आहे. यामुळे गेल्या आठवड्यापासून राज्यात पावसाचे सावट निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांत राज्याला अवकाळी पावसाचा सामना करावा लागला होता. काही ठिकाणी गारपिटीमुळे मोठे नुकसानदेखील झाले होते. तसेच अशीच परिस्थिती पुढील आठवडाभर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कोकणात पावसाची शक्यता -