मुंबई - प्रत्येकाला समान वागणूक देणे ही राज्यपालांची जबाबदारी आहे. राज्यपाल कोश्यारी लोकांमध्ये तेढ आणि फूट निर्माण करत आहेत. त्यामुळे लोकं दुखावले आहेत. मी राष्ट्रपतींना राज्यपालांना हटवण्याची विनंती करणार असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
16:21 July 30
राज्यपाल कोश्यारी लोकांमध्ये तेढ आणि फूट निर्माण करतायेत : सुप्रिया सुळे
10:07 July 30
माहूरमध्ये अजित पवार यांनी पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी
नांदेड: विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार आज नांदेड दौऱ्यावर आहेत. नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे अजित पवार यांनी पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी पाहणी केली. यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा अजित पवार यांनी ऐकून घेतल्या.
09:43 July 30
Breaking news - राज्यापालांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राजकीय पक्षांची टीका
मुंबई - राज्यपालांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी मुंबईतून गुजराथी आणि राजस्थानी गेले तर पैसाच राहणार नाही. तसेच मुंबईची आर्थिक राजधानी अशी ओळखच मिटेल असे म्हटले आहे. त्यावर शिवसेना, मनसे तसेच राष्ट्रवादीने टीका केली आहे.