मुंबई -एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ( Eknath Shinde's rebellion ) त्यांच्याकडे आमदारांचे संख्याबळ अधिक असल्याचा त्यांनी केलेला दावा पाहता आता मध्यावधी निवडणुका ( Midterm elections ) की सत्तांतर हा प्रश्न आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर आता सरकार बरखास्त होण्याची शक्यता आहे. मंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे मात्र मंत्रिमंडळ राज्यपालांना विधानसभा बरखास्तीची सूचनाही करू शकते.
मंत्रीमंडळ बैठकीत होणार निर्णय - शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर आता सरकार बरखास्त होण्याची शक्यता आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, मंत्रीमंडळ राज्यपालांना विधानसभा बरखास्तीची सूचनाही करू शकते. राज्यपाल यांनी बरखास्तीची सूचना मान्य करायची की भाजपला सत्तास्थापनेची संधी द्यायची हा निर्णय राज्यपालांचा असेल. सध्याची स्थिती पाहता भाजपला सत्ता स्थापनेसाठी पाचारण केली जाऊ शकते, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी व्यक्त केली आहे.