मुंबई - एसटी प्रश्नांवर सरकार गंभीर नाही. विद्यार्थ्यांचे व जनतेचे हाल होत आहेत. अस असताना आमदारांना फुकट घर देण्याची गरज काय? असा प्रश्न भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. विधानभवनात ते बोलत होते. एसटी संप मिटत नसल्याने सामान्य जनतेचे विशेष करून ग्रामीण भागात जनतेचे मोठे हाल होत आहेत. जळगावात बोधवड येथे एका विद्यार्थिनीचा खाजगी वाहनातून पडून मृत्यू झाला. पण तरीसुद्धा सरकारला पाझर फुटत नाही.
खासगी गाडीतून पडून मृत्यू - आज एका विद्यार्थिनीचा खाजगी प्रवासामध्ये जीव गेलेला आहे व त्याच्या आईने स्वतः सांगितले आहे की आज एसटी सुरू असती तर हे झाले नसते आणि तरीसुद्धा सरकार चालढकल करत आहे. प परिवहन मंत्री फक्त या संदर्भामध्ये निवेदन करणार, निवेदन करणार असं म्हणत आहेत. परंतु सरकार याबाबत गंभीर नाही, असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. विशेष करून एसटी संदर्भात या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तोडगा निघेल अशी अपेक्षा अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून होती. परंतु आज अधिवेशनाची सांगता होत असताना सुद्धा याबाबत तोडगा निघाला नाही या कारणाने जनतेमध्ये रोष असून सामान्य लोकांचे फार मोठ्या प्रमाणामध्ये हाल होत आहेत असेही ते म्हणाले.