महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 8, 2020, 8:31 PM IST

ETV Bharat / city

#फ्री काश्मीर फलक प्रकरण : दादर येथे भाजपकडून निदर्शने

जेएनयू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे केलेल्या आंदोलना दरम्यान फ्री काश्मीरचा फलक फडकावण्यात आला. त्यामुळे बुधवारी दादर येथे भाजपकडून फ्री काश्मीर फलक प्रकरणी निदर्शने करण्यात आली.

BJP protests over Free Kashmir poster case in Dadar at Mumbai
फ्री काश्मीर फलक प्रकरणी मुंबईतील दादर येथे भाजपकडून निदर्शने

मुंबई -जेएनयू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ गेट वे ऑफ इंडिया येथे विद्यार्थ्यांनी निषेध व्यक्त केला होता. यावेळी काही उपस्थितांनी काश्मीर मुक्तच्या घोषणा दिल्या असल्याचा आरोप, भाजपकडून केला जातोय. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज बुधवारी शिवाजी पार्क येथे स्वातंत्र्यवीर स्मारकात भाजपचे कार्यकर्ते जमले होते. तसेच अभिनेत्री जुही चावला, इतर कलाकार आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. यावेळी 'काश्मीर वेगळा करण्याच्या विचार केलात तर याद राखा' असा इशारा देण्यात आला.

फ्री काश्मीर फलक प्रकरणी मुंबईतील दादर येथे भाजपकडून निदर्शने

हेही वाचा... लेकीला लक्ष्मी मानणाऱ्या 'त्या' पित्याने जिंकले अशोक चव्हाणांचे मन.. फोन करून केली विचारपूस !

गेट वे ऑफ इंडिया येथे जेएनयुत झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ विद्यार्थी जमले होते. यावेळी काहींनी काश्मीरचे मुक्त नारे दिले, असा आरोप करण्यात येत आहे. याच्या निषेधार्थ दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाजवळ भारतीय जनता पक्षातर्फे निदर्शने करण्यात आली. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, शायना एन सी, अभिनेता दिलीप ताहिल यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा...विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचे पंडित नेहरू यांच्या विरोधात वादग्रस्त विधान.. परिषदेत गदारोळ

'देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपर्यंत एक दिवस पण सुट्टी घेतली नाही. कोणतीही वस्तू तोडायला वेळ लागत नाही, पण जोडायला खूप वेळ लागतो. भारतातील 135 कोटी लोकसंख्येला संभाळणे अवघड आहे. ते काम नरेंद्र मोदी करत आहेत हे बघा, असे अभिनेत्री जुही चावला यांनी सांगितले.

भारताकडे कोणी वाकड्या नरजेने बघणार, तर याद राखा. काश्मीर भारतापासून कधीच वेगळा होणार नाही. देशात अनेक संघटना आहेत, मात्र विरोध फक्त काही संघटनामध्येच का होतो. आम्ही अशा घोषणा देणाऱ्यांना देशभक्तीचा मंत्र शिकवणार आहोत. तिरंगा ध्वज कापडाचा तुकडा नाही, हे याद राखा. काश्मीर तर कधीच भारतापासून स्वतंत्र होणार नाही, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details