महाराष्ट्र

maharashtra

BJP Polkhol Campaign : भाजपच्या 'पोलखोल' अभियानाचा शिवसेनेला बसणार का फटका? वाचा सविस्तर

By

Published : Apr 20, 2022, 7:18 PM IST

Updated : Apr 20, 2022, 10:39 PM IST

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ( Mumbai Municipal Corporation Election ) कुठल्याही परिस्थितीत महापालिकेवर आपला झेंडा रोवण्यासाठी भाजप पूर्णपणे सक्रिय झाला आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी शिवसेना विरोधात मुंबईत ( BJP Polkhol Campaign ) पोलखोल अभियानाला सुरुवात केली आहे. दरम्यान, भाजपाच्या या अभियानावर सुजात आंबेडकर ( Sujat Ambedkar ), प्रविण दरेकर ( Pravin Darekar ) आणि पांडुरंग सपकाळ ( Pandurang Sakpal ) यांनी प्रतिक्रिया दिली.

BJP Polkhol Campaign
BJP Polkhol Campaign

मुंबई -मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ( Mumbai Municipal Corporation Election ) कुठल्याही परिस्थितीत महापालिकेवर आपला झेंडा रोवण्यासाठी भाजप पूर्णपणे सक्रिय झाला आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी शिवसेना विरोधात मुंबईत ( BJP Polkhol Campaign ) पोलखोल अभियानाला सुरुवात केली आहे. मुंबईमध्ये भाजपच्या या पोलखोल अभियानाला शिवसेनेकडून अप्रत्यक्ष विरोध होत असून या अभियानावरून भाजप व शिवसेनेत कुठे ना कुठे तरी वाद निर्माण होत आहेत. भाजपच्या या अभियानाने शिवसेनेचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊन त्याचा फटका त्यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये बसेल, अशी चिंता व्यक्त केली जात असताना या अभियानाने मुंबईकरांना काय फायदा होऊ शकतो, हा सुद्धा चर्चेचा विषय झालेला आहे.

प्रतिक्रिया

पोलखोल अभियानाने शिवसेनेचा भ्रष्टाचार उघड? -पोलखोल अभियानावरून आता भाजप-शिवसेनेत कलगीतुरा रंगलेला आहे. चेंबूर येथे भाजपच्या पोलखोल अभियानाच्या रथाची अज्ञातांकडून तोडफोड केल्यानंतर भाजप याप्रश्नी आक्रमक झाला आहे. याबाबत ४ जणांना अटकही करण्यात आली असून त्यामध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचही सांगितले जात आहे. तर दुसरीकडे दहिसर येथे भाजपच्या पोलखोल अभियानाचा स्टेज बांधण्यासाठी शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी विरोध केल्याने तेथेसुद्धा तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. पोलखोल अभियानाने शिवसेनेचा मागील पंचवीस वर्षाचा भ्रष्टाचाराचा काळा चिट्ठा जनतेसमोर उघडा पडेल ही भीती त्यांना सतावत असल्याचं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितल आहे. त्याचबरोबर मुंबई पालिकेमधील शिवसेनेच्या भ्रष्टाचाराविषयी भाजप नेत्यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सुद्धा आवाज उठवला. परंतु सत्ताधारी शिवसेनेने त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणूनच आता हा आवाज ते पोलखोल या अभियानांतर्गत जनतेमध्ये उघडपणे सांगत असल्याचे दरेकर म्हणाले.

पोलखोल अभियानाचा फायदा कोणाला? -शिवसेना व भाजप यांची मुंबई महानगरपालिकेतील युती तुटली व दोघे एकमेकांवर खापर फोडू लागले. परंतु शिवसेना व भाजप यांच्यामध्ये हा कलगीतुरा रंगलेला असताना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस विशेष पक्ष मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराविषयी 'ब्र' काढायला सुद्धा तयार नाही. कारण मुंबई महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा यापूर्वीच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दिला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्या निवडणुकीतील हालचालींवर विषयी काँग्रेस पक्ष बारकाईने लक्ष ठेवून आहे. भाजपने सुरू केलेल्या पोलखोल अभियानाचा फटका शिवसेनेला बसणार असला तरी त्याचा फायदा राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांनाही होऊ शकतो. परंतु भाजपने सुरू केलेल्या पोलखोल अभियानाचा फटका हा मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेला बसणार, अशी शंका वर्तवली जात आहे.

जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न? -दुसरीकडे भाजपचे पोलखोल अभियान, शिवसेनेचा भ्रष्टाचार व त्याविषयी त्यांची उत्तरं हा सर्व प्रकार म्हणजेच लोकांची दिशाभूल करण्याचे काम असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सांगितलेल आहे. राज्यात, मुंबईत इतकेसारे गंभीर प्रश्न निर्माण झालेले असताना कुठलातरी विषय छेडून मग तो भोंग्याचा असेल, मराठी पाट्यांचा असेल यावरून लोकांची दिशाभूल करण्याचे काम हे पक्ष करत आहेत, असा आरोप त्यांनी लगावला आहे. आज महागाई प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे. इंधनाचे भाव दर दिवशी गगनाला भिडत आहेत. शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. युवा बेरोजगार झालेले आहेत. करोना नंतर आरोग्याचा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. परंतु याविषयी सत्ताधारी व विरोधक कोणीही बोलायला तयार नाही. फक्त नको त्या विषयावर राजकारण करत लोकांचे लक्ष विचलित करण्याच काम हे पक्ष करत आहेत, असा आरोपही सुजात आंबेडकर यांनी लगावला आहे.

'पोलखोलला योग्य वेळी उत्तर देऊ?'-भाजपच्या पोलखोल अभियाना विषयी बोलताना दक्षिण मुंबईचे शिवसेना विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ म्हणाले की, पोलखोल या अभियानाला आम्ही योग्य वेळी उत्तर देऊ. वास्तविक याबाबत प्रवीण दरेकर जे काही बोलत आहेत तर त्यांची पोलखोल सध्या होत आहे. त्यांनी मुंबई बँकेमध्ये जो काही भ्रष्टाचार केलेला आहे. तो आता जनतेसमोर उघड होणार आहे म्हणून त्यांनी त्याची चिंता करावी, असेही सकपाळ म्हणाले. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेतील २५ वर्षे युती असताना तेव्हा भाजपला अशा पोलखोल ची आठवण का झाली नाही? आता अचानक ही पोलखोल का? असा प्रश्नही त्यांनी न₹उओअस्थित केला आहे. मुंबईमध्ये कुठेही गुन्हे झाले, तर त्यामध्ये शिवसैनिक किंवा युवा सैनिकांना जोडलं जातं हे सुद्धा चुकीच असून तुम्ही कितीही पोलखोल अभियान घ्या, परंतु ते रीतसर परवानगी काढून घ्या. आम्ही योग्य वेळी त्याला उत्तर देऊ, असा इशाराही सकपाळ यांनी दिला आहे.

हेही वाचा -Mosque Loudspeaker Controversy : 'मशिदीवरील भोंग्याच्या मुद्यावर राज ठाकरेंसह सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांसोबत बैठक घेणार'

Last Updated : Apr 20, 2022, 10:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details