महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 14, 2022, 6:35 PM IST

Updated : Jan 14, 2022, 7:25 PM IST

ETV Bharat / city

No Confidence Motion: मुंबई पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांच्या विरोधात भाजपचा अविश्वास ठराव

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये सदस्यांना बोलू दिले जात नाही. प्रस्तावांवर चर्चा केली जात नाही. चर्चा ना करताच प्रस्ताव घाई गडबडीने मंजूर केले जातात. यामुळे भाजपाकडून स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर अविश्वास ठराव ( standing committee chairman against no confidence motion ) आणण्यात आल्याची माहिती भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली.

chairman Yashwant Jadhav
स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव

मुंबई - मुंबई महापालिकेच्या ( BMC ) स्थायी समितीमध्ये सदस्यांना बोलू दिले जात नाही. प्रस्तावांवर चर्चा केली जात नाही. चर्चा ना करताच प्रस्ताव घाई गडबडीने मंजूर केले जातात. यामुळे भाजपाकडून स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर अविश्वास ठराव ( standing committee chairman against no confidence motion ) आणण्यात आल्याची माहिती भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली.भाजपने मुंबईकरांच्या विकासाच्या आड न येता विकासकामांच्या प्रस्तावाना पाठिंबा द्यावा. राजकारण करून मुंबईकरांचा विकास रोखून धरून ठेवू नये असा प्रतिउत्तर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले आहे.

भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या प्रतिक्रिया

यासाठी आणला अविश्वास ठराव -

स्थायी समितीच्या सभेत महत्वाच्या विषयावर, आर्थिक भ्रष्टाचारावर, कोविड काळातील गैरव्यवहारावर, शालेय विद्यार्थ्यांच्या टॅब खरेदीतील भ्रष्टाचारावर, पोयसर नदी मलजल प्रक्रिया केंद्राच्या प्रस्तावातील भ्रष्टाचारावर सदस्यांना बोलू न देणे, घाईघाईत प्रस्ताव मंजूर करणे तसेच प्रस्तावास तीन सुस्पष्ट दिवस झाले नसताना प्रस्ताव विचारात घेणे या सर्व कायदेविसंगत अनियमितता व लोकशाहीची मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या वर्तवणूकीबद्दल अविश्वास आणला असल्याची माहिती भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली. तसेच आयकर खात्याच्या अहवालानुसार बृहन्मुंबई महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष, यशवंत जाधव यांनी भ्रष्टाचाराद्वारे जमा केलेले काळे धन सफेद करण्यासाठी पैशाची अवैध अफरातफर केल्याचे निदर्शनास आल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

भाजपकडून विकासाला खीळ बसवण्याचा प्रयत्न -

भाजपा नेहमीच सर्व प्रस्तावांना विरोध करत आहे. गेले 3 ते 4 बैठकांचे प्रस्ताव प्रलंबित होते. सिंधुताई सकपाळ यांच्या निधनाने एक सभा झाली नव्हती. अनेक विकासाचे प्रस्ताव खोळंबले होते. अनेक विकासाची कामे असल्याने ते प्रस्ताव मंजूर करण्याची गरज होती. भाजपा सदस्य नको ते मुद्दे काढून सभा तहकुबीची मागणी करातात. कोणत्याही उपसूचना मांडून प्रस्ताव रोखण्याचे प्रयत्न करतात. विकासाला खीळ बसवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. मुंबईकरांना सुविधा मिळाल्या पाहिजेत. सभा हाऊ न देणे हा विचार चुकीचा आहे. भाजपने मुंबईकरांच्या हिताचा विचार करावा. स्थायी समितीमध्ये सर्वाना बोलायला दिले जाते अशी प्रतिक्रिया स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली आहे.

हेही वाचा -Shivsena Mla Dilip Lande : शिवसेना आमदार दिलीप लांडे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

Last Updated : Jan 14, 2022, 7:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details