महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कांजूरमार्गला कारशेड नेण्याची घोषणा फसवी; भाजप नेते अतुल भातखळकर यांचा दावा - मेट्रो-3 चे कारशेड कांजूरमार्गला

मेट्रो-3 चे कारशेड कांजूरमार्ग येथे हलवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्या विरोधात भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांनी आरेतील कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याची केलेली घोषणा फसवी असल्याचा दावा केला आहे.

भाजप नेते अतुल भातखळकर
भाजप नेते अतुल भातखळकर

By

Published : Oct 11, 2020, 4:01 PM IST

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे येथील मेट्रो-3 चे कारशेड कांजूरमार्ग येथे हलवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्या विरोधात भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांनी आरेतील कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याची केलेली घोषणा फसवी असल्याचा दावा केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी या कारशेड हलवण्याच्या निर्णयावरून राज्याची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एका समितीने केलेल्या निष्कर्षानुसार मेट्रो-3 च्या कारशेडसाठी केवळ आरेतील जागा योग्य असल्याचे म्हटले आहे. शिवाय कांजूरमार्ग येथील जागा जाहीर करण्यात आली आहे ती जागा योग्य नसून त्यासंदर्भात अनेक वाद असल्याचा दावाही भातखळकर यांनी केला आहे.

हेही वाचा -उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद : मेट्रो कारशेड आता कांजुरमार्गला ; शेतकरी, आदिवासींचे हित जपणार

एका ट्विटमध्ये भातखळकर म्हणतात की, मेट्रो कारशेड कांजूरला नेण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा फसवी आहे. कारण ही जमीन कोर्टकज्ज्यात अडकलेली आहे. मुंबईत कारशेडसाठी फक्त आरेची जमीन उपयुक्त असल्याचा तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल असताना ही उठाठेव कशाला? असा प्रश्न त्यांनी आपल्या ट्विटमधून उपस्थित करत मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details