महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pulses Scarcity Issue : भाजीपाल्या पाठोपाठ आता डाळींचाही जाणवू लागला तुटवडा - इंडिया पल्सेस अँड ग्रेन असोसिएशन

बाजारातील भाज्यांचे भाव गगनाला भिडले असताना आता डाळ टंचाईचे संकट घोंघावू लागले आहे. यंदा दहा लाख मेट्रिक टन डाळीचा तुटवडा निर्माण झाला आहे, अशी माहिती इंडिया पल्सेस अँड ग्रेन असोसिएशनचे ( India Pulses and Grain Association ) अध्यक्ष विमल कोठारी यांनी दिली.

Pulses
डाळी

By

Published : Apr 22, 2022, 10:49 PM IST

मुंबई: राज्यासह देशभरात भाज्यांचे भाव कडाडले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे वाहतूक खर्चात वाढ झाल्याने सर्व वस्तूंचे भाव कडाडत आहेत. यंदा पाऊस जरी चांगला झाला असला, तरी तूर मसूर आणि उडीद उत्पादनात फारसा फरक पडलेला नाही. परिणामी देशातील डाळींचे उत्पादन कमी ( Pulses Production Decreased in country ) झाले आहे.



डाळीची गरज आणि उपलब्धता - दरवर्षी देशात सुमारे ४५ लाख टन तूर डाळीची गरज भासते. मात्र यंदा केवळ 35 लाख टन तूरडाळ उपलब्ध आहे. मसूर डाळीची सुमारे २२ लाख टन मागणी असते. मात्र यंदा केवळ १४ लाख टन मसूर डाळीचे उत्पादन ( Production of lentils ) झाले आहे. यासाठी कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये काही लाख टन डाळ तयार केली जाणार आहे. उडीद डाळीची २५ लाख टनांची मागणी असते. ही सुद्धा यंदा कमी प्रमाणात उत्पादित झाली आहे. सध्या देशात उडीद डाळीचा तुटवडा असल्यामुळे केंद्र सरकारने आयात खुली केली आहे. त्यानुसार म्यानमारमधून तूर डाळ आयात ( Import of pulses from Myanmar ) केली जात आहे. ऑगस्टमध्ये पूर्व आफ्रिकेतून डाळ मागवली जाणार आहे. केंद्र सरकारने आयात सुरू ठेवल्यास डाळीचा तुटवडा कमी होईल, असा दावा इंडिया पल्सेस अँड ग्रेन असोसिएशनचे अध्यक्ष विमल कोठारी यांनी केला आहे.



युक्रेनमधून आयात होतो पांढरा वाटाणा - देशात सध्या हरभऱ्याचे उत्पादन जोमात आले आहे, मात्र केंद्र सरकार पांढरा वाटाणा आयात करत आहे. पांढरा वाटाणा हरभऱ्याच्या तुलनेत स्वस्त असल्याने हरभऱ्याचे भाव कमी होऊ लागले आहेत. त्यामुळे पांढऱ्या वाटाण्याची आयात बंद करण्याचा निर्णय सरकार घेण्याची शक्यता आहे. सध्या देशभरात चना डाळीचे उत्पादन ( Production of gram pulses ) चांगले झाले असून देशातील गोदामांमध्ये ११३ लाख मेट्रिक टन चणाडाळ शिल्लक असून पुरेशी असल्याचा दावा कोठारी यांनी केला आहे. त्यामुळे विक्रीमधून कोणत्याही परिस्थितीत आयात गरजेचे असल्याचेही कोठारी यांनी सांगितले.

हेही वाचा -रेल्वेची डोकेदुखी वाढली; अवघ्या २० दिवसांत १५७ अलार्म चेन पुलिंगच्या घटना

ABOUT THE AUTHOR

...view details