महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ajit pawar criticize shinde goverment mla सत्ताधारी पक्षातील आमदारांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली का

औरंगाबादचे आमदार यांनी मध्यान्ह भोजनाच्या मुद्द्यावरून Ajit pawar criticize shinde goverment mla अधिकाऱ्यांना मारहाण केली. एवढे करूनही कोणत्याही ajit pawar on Monsoon session आमदाराने माफी मागितली नाही किंवा याबाबत दिलगिरी व्यक्त केली नाही. त्यामुळे, या आमदारांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे का? असा प्रश्न अजित पवार ajit pawar on shinde government यांनी उपस्थित केला.

By

Published : Aug 17, 2022, 9:59 AM IST

ajit pawar criticize shinde goverment mla
शिंदे सरकारमधील आमदारांवर अजित पवार यांची टीका

मुंबईनुकतेच सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे सरकारच्या आमदारांच्या Ajit pawar criticize shinde goverment mla डोक्यात सत्तेची हवा गेली आहे का? असा सवाल अजित पवार यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत ajit pawar on Monsoon session उपस्थित केला आहे. सरकारी पक्षाचे आमदारच मुंबईत शिवसैनिकांचे हात-पाय तोडण्याची भाषा करतात. तर औरंगाबादचे आमदार यांनी मध्यान्ह भोजनाच्या मुद्द्यावरून अधिकाऱ्यांना मारहाण केली. एवढे करूनही कोणत्याही आमदाराने माफी मागितली नाही किंवा याबाबत दिलगिरी ajit pawar on shinde government व्यक्त केली नाही. त्यामुळे, या आमदारांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे का? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. या आमदारांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी केली. तसेच, गोंदिया जिल्ह्यात झालेल्या बलात्कारानंतर राज्यामध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

हेही वाचाFree ST Bus Service 75 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी मधून मोफत प्रवास

आज होणाऱ्या पावसाळी अधिवेशन आधी सरकारच्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला असल्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. त्याआधी विरोधी पक्षनेत्यांची बैठक विधान भवनामध्ये पार पडली. या बैठकीला अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, जयंत पाटील, काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि यासारखे ज्येष्ठ नेते मंडळी उपस्थित होते. या बैठकीत उद्या होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारला कोणत्या मुद्द्यावर अडचणीत आणले जाऊ शकते याबाबत चर्चा झाली असून पावसाळी अधिवेशनाबाबतची विरोधी पक्षाची रणनीती ठरली आहे. या बैठकी नंतर पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचे जाहीर केले. यावेळी अजित पवार यांनी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर टीक करत त्यांच्यात सत्तेची हवा गेली काय असा सवाल केला.

शिंदे सरकारने लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्याराज्यात सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे सरकारने लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या आहे. या सरकारबाबत सर्वोच्च न्यायालयात अजूनही सुनावणी सुरू आहे. सरकारचे अस्तित्व धोक्यात असताना अशा सरकारच्या चहापान कसा स्वीकारायचा. सरकार सत्तेत आल्यानंतर मागील सरकारचे जवळपास 570 निर्णय या सरकारने थांबवले.

शेतकऱ्यांना आणि मजुरांना अद्याप मदत नाहीराज्यांमध्ये होणाऱ्या अतिवृष्टीचा फटका मोठ्या प्रमाणात शेतकरी ajit pawar on help to farmers आणि शेतमजूर यांना बसला आहे. महाविकास आघाडी सरकार असताना एनडीआरएफचे निकष बाजूला सारत तीन पट मदत सरकारने केली होती. मात्र, नवी सरकार केवळ दुप्पट मदत केल्याचे जाहीर करत आहे. ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे. एनडीआरएफ हे निकष कालबाह्य ajit pawar on heavy rainfall in maharashtra झाले असून ते बदलण्याची विनंती महाविकास आघाडी सरकारने पंतप्रधानांना केली होती. मात्र, अद्याप कोणतेही बदल झालेले नाहीत. त्यामुळे, सध्या राज्य सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. तिथून पुढची मदतही शेतकऱ्यांना मिळालेली नाही, असा आरोप अजित पवार यांनी पत्रकार परिषदेतून केला.

राज्यात अतिवृष्टी आणि पुराचा धोकाभंडारा, गोंदिया जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी होत आहे. या परिसरात असलेली सर्व धरण तुडुंब भरले असून या धरण क्षेत्रामध्ये पूर येण्यासारखी स्थिती आहे. म्हणून धरण क्षेत्रात तसेच नदीकाठावरील ajit pawar on farmers loss due to raifall नागरिकांचे स्थलांतर केले जात आहे. धरणांमधील पाण्याचा विसर्ग करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही मात्र तो विसर्ग करत असताना काळजी घेणे आवश्यक असल्याचेही अजित पवार यांनी राज्य सरकारला सूचित केला आहे.

बुलेट ट्रेनला निधी मात्र शेतकऱ्यांना मदत नाहीराज्यामध्ये एकनाथ शिंदे सरकार आल्यानंतर त्यांनी तात्काळ बुलेट ट्रेनला दहा हजार कोटी रुपयांचा निधी दिला. मात्र राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या शेतकऱ्यांना अद्यापही मदत राज्य सरकारकडून दिली नसल्याचे आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. तसेच, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची जमीनच वाहून गेली आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात बुरहणी वाहून गेली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली. त्यामुळे ही जमीन किती इंच, किती सेंटीमीटर वाहून गेलr याचा काहीही प्रमाण मोजता येत नाही. त्यामुळे, याबाबत मदत कशी करणार, असा सवाल दानवे यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

हेही वाचाMonsoon Session 2022 शिंदे सरकारचे पहिले अधिवेशन सुमारे ७०० ते ७५० तारांकित प्रश्न असल्याची सूत्राची माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details