महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईकरांसाठी खुशखबर.. तब्बल दीड वर्षानंतर गुरुवारपासून पूर्णक्षमतेने धावणार लोकल ! - मुंबई लोकल

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांची जीवन वहिनी म्हणणाऱ्या उपनगरीय लोकल सेवा गेल्या दीड वर्षांनंतर गुरुवारपासून पूर्ण क्षमतेने धावणार आहे. त्यामुळे गर्दीतून प्रवास करणाऱ्या लोकल प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

mum
mum

By

Published : Oct 25, 2021, 11:43 PM IST

मुंबई - मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांची जीवन वहिनी म्हणणाऱ्या उपनगरीय लोकल सेवा गेल्या दीड वर्षांनंतर गुरुवारपासून पूर्ण क्षमतेने धावणार आहे. त्यामुळे गर्दीतून प्रवास करणाऱ्या लोकल प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शंभर टक्के फेऱ्या होणार -

गेल्या वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले होते. या लॉकडाऊन काळात रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. नंतर 15 जून 2020 पासून, रेल्वेने राज्य सरकारने निवडलेल्या आणि रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या अत्यावश्यक सेवा श्रेणीं कर्मचाऱ्यांनासाठी उपनगरीय सेवा सुरू केली होती. आता गेल्या काही महिन्यांपासून कोरोना लशीचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना उपनगरीय लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आले आहे. यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे. तर, नुकताच एका दिवसात 60 लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली. कोरोना पूर्वीच्या प्रवासी संख्येपेक्षा फक्त 25 टक्के प्रवासी संख्या कमी आहे. या सर्व प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी 95 टक्क्यांहून 100 टक्के फेऱ्या गुरुवारपासून चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

गुरुवारी इतक्या धावणार लोकल फेऱ्या-

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मध्य रेल्वेवरून 1 हजार 702 आणि पश्चिम रेल्वेवरून 1 हजार 304 लोकल फेऱ्या धावत आहेत. असे एकूण 95.70 टक्के लोकल फेऱ्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून धावत आहेत. तर, गुरुवारी पासून मध्य रेल्वेवरून 1 हजार 774 फेऱ्या आणि पश्चिम रेल्वेवरून 1 हजार 367 फेऱ्या अशा 100 टक्के फेऱ्या धावणार आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या प्रवाशांच लोकलमधून प्रवास करण्याची मुभा असल्याचे मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details