मुंबई - राखीव जागांवर ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र असने बंधनकारक असते. मात्र असे प्रमाणपत्र नसल्यास जात पडताळणी समितीकडे हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केलेल्या अर्जाची सत्यप्रत अथवा पोचपावती किंवा अर्ज केल्याबाबतचा कोणताही पुरावा सादर करण्याची मूभा आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे. त्यामुळे उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात प्रमाणपत्राची पोचपावती देखील ग्राह्य धरली जाणार - Gram Panchayat elections 2021updates
राखीव जागांवर ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र असने बंधनकारक असते. मात्र असे प्रमाणपत्र नसल्यास जात पडताळणी समितीकडे हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केलेल्या अर्जाची सत्यप्रत अथवा पोचपावती देखील निवडणूक विभागाकडे सादर करता येणार आहे.
![ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात प्रमाणपत्राची पोचपावती देखील ग्राह्य धरली जाणार Gram Panchayat elections news](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9877698-170-9877698-1607954023579.jpg)
अर्जासोबत हमीपत्र देखील जोडावे लागणार
मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने 11 डिसेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 30 डिसेंबर 2020 पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. राखीव जागांवर निवडणूक लढविण्यासाठी नामनिर्देशपत्र दाखल करताना जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास, जात पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाबाबतचा पुरावा सादर करण्याबरोबरच एक हमीपत्रही देणे आवश्यक राहील. विजयी झाल्याच्या दिनांकापासून 12 महिन्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र सादर करेन असे या हमीपत्रात नमूद करावे लागणार आहे.