मुंबई - मुंबईमध्ये गेल्या वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रसार रोखण्यासाठी मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जे नागरिक मास्क घालत नाहीत अशा नागरिकांकवर पालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र त्यानंतरही अनेक नागरिक मास्कचा वापर करत नसल्याचे निदर्शनास येत आहे. विनामास्क नागरिकांवर महापालिका, क्लिनअप मार्शल तसेच पोलीसांकडून कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण २७ लाख ५८ हजार ६४९ नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. यातून तब्बल ५५ कोटी ५६ लाख २१ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
विनामास्क नागरिकांवर कारवाई
बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोविड-१९ अर्थात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार व प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याकरिता मार्च २०२० पासून विविध उपाययोजना वेळोवेळी नागरिकांच्या हितासाठी अमलात आणलेल्या आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे नागरिकांनी मास्क वापरणे आवश्यक आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विनामास्क घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना २०० रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले होते. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीत विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर अधिकाधिक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, २० एप्रिल २०२० पासून कारवाई केली जात आहे. आतापर्यंत एकूण २७ लाख ५८ हजार ६४९ नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यातून ५५ कोटी ५६ लाख २१ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पालिकेची कारवाई
मुंबई महापालिकेने आतापर्यंत २३ लाख ९६ हजार २४९ नागरिकांवर कारवाई केली आहे. या कारवाईमधून ४८ कोटी २८ लाख ८० हजार ८०० रुपये इतका दंड वसूल केला आहे.
पोलिसांची कारवाई