मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत असून यामुळे चिंतेचे वातावरण सध्या पसरले आहे. कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळविण्यासाठी लॉकडाऊचा काळ हा 3 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. मुंबई शहरात संचारबंदीसह कलम 144 लागू करण्यात आला आहे. असे असतानाही मुंबईत संचार बंदीचा कायदा मोडण्याच्या संदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लॉकडाऊनच्या काळात मुंबईत 5613 आरोपींना अटक - peoples arrest by police in Mumbai
गेल्या 24 तासात मुंबई शहरात कलम 188नुसार 229 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे, व अवैध वाहतूक प्रकरणी दक्षिण मुंबईतून 33 गुन्हे, मध्य मुंबईतून 69, पूर्व मुंबईत 45, पश्चिम मुंबईत 41 व उत्तर मुंबईत 41 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
![लॉकडाऊनच्या काळात मुंबईत 5613 आरोपींना अटक 5613 peoples arrest by police](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6804668-200-6804668-1586954111899.jpg)
लॉक डाऊनच्या काळात मुंबईत 5613 आरोपीना अटक
आतापर्यंत 5613 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील 259 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. 1133 आरोपीना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले असून तब्बल 4220 जणांना जामिनावर सोडण्यात आले आहे.
गेल्या 24 तासात मुंबई शहरात कलम 188नुसार 229 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे, व अवैध वाहतूक प्रकरणी दक्षिण मुंबईतून 33 गुन्हे, मध्य मुंबईतून 69, पूर्व मुंबईत 45, पश्चिम मुंबईत 41 व उत्तर मुंबईत 41 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.