मुंबई -आज राज्यात ४,३८२ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १९,५४,५५३ वर पोहचला आहे. राज्यात आज ६६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४९,८२५ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५५ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ५०,८०८ ऍकक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
महाराष्ट्र कोरोना अपडेट - राज्यात ४,३८२ नवीन रुग्णांचे निदान, ६६ रुग्णांचा मृत्यू - 4,382 new corona patients in the state
राज्यात ४,३८२ नवीन कोरोना रुग्ण आढळले. आता पर्यंत एकून ४९,८२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७९ टक्के -
राज्यात आज २,५७० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण १८,५२,७५९ कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७९ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३१,३४,०१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,५४,५५३ नमुने म्हणजेच १४.८८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २,३३,८७५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून राज्यात एकूण ५०,८०८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कधी किती रुग्ण आढळून आले -
राज्यात जून दरम्यान दिवसाला ५४०० हजार रुग्ण आढळून येत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात हि रुग्णसंख्या १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती. मात्र ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे. राज्यात १२ ऑक्टोबरला ७०८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८५२२ रुग्ण आढळून आले होते. १९ ऑक्टोबरला ५९८४ रुग्णांची, २६ ऑक्टोबरला ३६४५, ७ नोव्हेंबरला ३,९५९, १० नोव्हेंबरला ३,७९१, १५ नोव्हेंबरला २,५४४, १६ नोव्हेंबरला २,५३५, १७ नोव्हेंबरला २,८४०, २० नोव्हेंबरला ५,६४०, तर २१ नोव्हेंबरला ५७६० रुग्ण आढळून आले आहेत.