मुंबई - आज राज्यात 2405 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 लाख 13 हजार 353 वर पोहचला आहे. आज 47 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 50 हजार 862 वर पोहचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 95.24 टक्के तर मृत्यूदर 2.53 टक्के आहे. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
43 हजार 811 अॅक्टिव्ह रुग्ण -
राज्यात आज 2106 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 19 लाख 17 हजार 450 वर पोहचला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 43 लाख 15 हजार 227 नमुन्यांपैकी 20 लाख 13 हजार 353 नमुने म्हणजेच 14.06 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 84 हजार 944 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 43 हजार 811 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
या दिवशी सर्वात कमी रुग्णांची नोंद -
राज्यात गेल्या दहा महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. या कालावधीत राज्यात 15 नोव्हेंबरला 2 हजार 544, 17 नोव्हेंबरला 2 हजार 840, 18 जानेवारीला 1 हजार 924 तर 25 जानेवारीला 1 हजार 842 इतके सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.