महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

महाविकासआघाडीला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करण्याची राज्यपालांना विनंती

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी आज राज्यपालांना आमदारांच्या सह्यांचे पत्र देऊन महाविकासआघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करण्याची विनंती यात केली आहे.

By

Published : Nov 25, 2019, 1:05 PM IST

Updated : Nov 25, 2019, 1:33 PM IST

महाविकासआघाडी

मुंबई- शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी आज राज्यपालांना आमदारांच्या सह्यांचे पत्र देऊन महाविकासआघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करण्याची विनंती यात केली आहे. आमच्याकडे 162 आमदारांचे सह्या केलेले पत्र असून ते आम्ही राज्यपालांना दिले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. त्याचबरोबर पाठिंब्यासाठी पाहिजे असल्यास या सर्व 162 आमदारांची राज्यपालांपुढे परेड करू, असेही ते म्हणाले.

महाविकासआघा़डीची पत्रकार परिषद

हेही वाचा -अजित पवारांच्या अनुपस्थित मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वीकारला पदभार

दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली शपथ ही अवैध आहे. यामुळे फडणवीस आणि अजित पवार यांनी लोकशाहीच्या प्रक्रियेचा गळा घोटल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांनी दिलेल्या सह्यांच्या पत्राचा अजित पवार यांनी गैरवापर केल्याचे पाटील यांनी सांगितले आहे. तसेच आमच्याकडे बहुमतापेक्षा जास्त आकडा असून आम्हाला राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी बोलवावे असेही महाविकासआघाडीच्या नेत्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -अजित पवार यांचे मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू- छगन भुजबळ

एका रात्रीत तयार झालेले सरकार हे जनतेला मान्य नाही. भाजपने जनतेची फसवणूक केली असून सरकार कदाचित विधानसभा बरखास्त करण्याची शक्यता आहे. 54 राष्ट्रवादीच्या आमदारांपैकी 53 आमदार राष्ट्रवादीसोबत असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, अजित पवार यांची मनधरणी करण्यासाठी मी शेवटी त्यांची भेट घेणार असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून सत्तापेचाबद्दल उद्या(मंगळवार) सर्वोच्च न्यायालयात सकाळी साडेदहा वाजता होणार आहे.

Last Updated : Nov 25, 2019, 1:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details