महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 27, 2022, 7:12 PM IST

ETV Bharat / city

तारखेप्रमाणे काही गोष्टी झाल्या नाहीत; समन्वयकांच्या सुद्धा काही भावना आहेत : संभाजीराजे

मराठा समाजातील समन्वयकांच्या आंदोलनाबाबत मला आत्ता समजले. समन्वयकांच्या देखील भावना आहेत, असे मत संभाजी राजे यांनी (Sambhajiraje in kolhapur) कोल्हापूरात व्यक्त केले. ते कोल्हापूरात शाहू स्मृती शताब्दी पार्श्वभूमीवर कृतज्ञता पर्वात (Krydanyata Parva) बोलत होते.

Sambhajiraje
Sambhajiraje

कोल्हापूर : मराठा समाजातील समन्वयकांच्या आंदोलनाबाबत मला आत्ता समजले. समन्वयकांच्या देखील भावना आहेत. मला जे शब्द दिले होते त्यानुसार तारखेप्रमाणे काही गोष्टी झाल्या नाहीत. मात्र, काहीच केले नाही असे सुद्धा नाही असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. शिवाय भावना व्यक्त करणे हा तुमचा अधिकार आहे. मात्र, हातात कायदा घेऊन कोणती गोष्टी करू नका असे आवाहनसुद्धा संभाजी राजे यांनी (Sambhajiraje in kolhapur) आंदोलकांना केले. कोल्हापूरात शाहू स्मृती शताब्दी पार्श्वभूमीवर कृतज्ञता पर्वाचे (Krydanyata Parva) आयोजन केले आहे. या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आज शाहू मिल येथे आयोजित प्रदर्शन पाहण्यासाठी ते आले होते तेंव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन आला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः दूरध्वनीवरून संवाद साधला आहे. काही गोष्टी कागदोपत्री आहेत त्यावर मार्ग निघाला पाहिजे. उद्या कॅबिनेट बैठक झाल्यानंतर समन्वयकांशी बोलण्याचा शब्द अजित पवार यांनी दिला आहे. सरकारने आदेश दिले की, त्यांचे पालन करणे अधिकाऱ्यांचे काम आहे. काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या अधिकाऱ्यांनी दूर केल्या पाहिजेत. अधिकाऱ्यांची देखील तेवढीच जबाबदारी आहे. त्यामुळे लवकर तुम्ही दिलेल्या तारखा पाळून त्यावर मार्ग काढा अशी अपेक्षा असल्याचे सुद्धा यावेळी संभाजीराजे यांनी म्हंटले. गरीब मराठ्यांसाठी जे मला करायचं होते ते मी केले असेही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा -Marathi Kranti Morcha : मराठा क्रांती मोर्चाचा मंत्रालयात ठिय्या; महाविकास आघाडीविरोधात आक्रमक

स्मृती शताब्दी वर्षासारखी संधी पुन्हा नाही
राजर्षी शाहू समाधी स्मारकाला उरलेला निधी सरकारने तात्काळ दिला पाहिजे. कोल्हापुरात राजर्षी शाहूंचे जिवंत स्मारक व्हावे यासाठी सर्वांनी बसून चर्चा करून ठोस निर्णय घ्यायला पाहिजे. स्मृती शताब्दी वर्षासारखे चांगली संधी पुन्हा येणार नाही. त्यामुळे शाहू मिलच्या रूपाने एक जिवंत स्मारक झाले पाहिजे. यासाठी राज्य सरकार तसेच केंद्र सरकारकडून सुद्धा ठोस निर्णय घेतला गेला पाहिजे. आणि याबाबत आपल्याकडे काय प्लॅन आहेत ते सुद्धा आता सांगितले पाहिजे, असे संभाजीराजे यांनी म्हंटले.

3 मे नंतर नक्कीच माझी पुढची भूमिका स्पष्ट करणार
येत्या तीन मे रोजी माझी खासदारकीची टर्म संपत आहे. चार मे रोजी उठून मी पहाटेच बोललो पाहिजे असे काही नाही. मात्र, अनेक गोष्टी माझ्या डोक्यात आहेत. कोल्हापूरकरांना जेवढी उत्सुकता पुढील भूमिकेबाबत असणार आहे. तेवढीच मलाही उत्सुकता असल्याचे यावेळी संभाजीराजे यांनी म्हंटले.
हेही वाचा -BMC Election : मुंबईत आघाडीत बिघाडी?; पालिका, बेस्टच्या कार्यक्रमांना काँग्रेसची दांडी

ABOUT THE AUTHOR

...view details