औरंगाबाद : राज्यात महाविकास आघाडीचे समीकरण समोर आल्यानंतर लवकरच वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना हे समीकरण (Shiv Sena Vanchit Bahujan Aghadi alliance) सुरू व्हावं, असे संकेत देण्यात आले आहेत. वंचित नेते प्रकाश आंबेडकरयांनी उद्धव ठाकरे यांना त्याबाबत पत्र दिल्याचं समोर आलं (Prakash Ambedkar letter to Uddhav Thackeray) आहे, असं झाल्यास निश्चितच शिवसेनेला फायदा होईल, असं मत पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केलं.
नव्या समिकरणाला राष्ट्रवादी अडचण -वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे नव्या युतीबाबत प्रस्ताव पाठवला आहे. मात्र त्यावेळेस राष्ट्रवादी पक्षाची अडचण युतीला येईल, असे संकेत देखील वंचितकडून (Vanchit Bahujan Aghadi) देण्यात आले आहेत. शिवसेनेसोबत भाजप सोबत असल्याने शिवसेनेसोबत जाणे शक्य नव्हते. मात्र आता शिवसेना वेगळी झाल्याने त्यांच्यासोबत जाण्यात हरकत नाही. मात्र त्यांनी राष्ट्रवादीसोबत राहू नये, असं देखील वंचित कडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे नव्या प्रस्तावला राष्ट्रवादी अडसर ठरेल असे संकेत मिळत आहेत.