औरंगाबाद-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांच्या भाषणातील काही मुद्यांचे स्वागत करतो, मात्र विकासाबाबत काय? महाराष्ट्र कसा पुढे जाणार या बाबत बोलले असते तर आम्हाला आनंद झाला असता अशी भूमिका एमआयएम प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली. ( Imtiaz jalil about CM Uddhav Thackeray Aurangabad Public Meeting )
काही मुद्द्यांचे स्वागत -शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुस्लिम द्वेष नाही अस म्हणले या वक्तव्याचे स्वागत करत असल्याच खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले. तर भाजप प्रवक्त्याने प्रेषित पैगंबर बाबत केलेल्या विधानामुळे देशाची नाचक्की झाली. मात्र हे विधान भाजपने केले आहे. त्यामुळे भारत माफी मागणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. ही भूमिका योग्य असून भूमिकेचे आम्ही समर्थन करत असल्याचे खासदार जलील यांनी सांगितले.