महाराष्ट्र

maharashtra

Subhash Desai : दोन वर्षात राज्यात 126 नवीन कंपन्या, उद्योगमंत्र्यांची माहिती

By

Published : Dec 10, 2021, 7:49 PM IST

Updated : Dec 10, 2021, 8:01 PM IST

1 लाख 83 हजार कोटीची गुंतवणूक ( 1 Lakh 83 Thousand Crore Investment ) करण्यात आली आहे. 3 लाख 30 तरुणांना रोजगार मिळाला ( 3 Lakh 30 Youths Got Employment ) आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक उद्योग आले, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई ( Subhash Desai Minister for Industries ) यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

सुभाष देसाई
सुभाष देसाई

औरंगाबाद -दोन वर्षात राज्यात 126 नव्या कंपन्या ( 126 New Companies in The State ) आल्या आहेत. त्यामाध्यमातून 1 लाख 83 हजार कोटीची गुंतवणूक ( 1 Lakh 83 Thousand Crore Investment ) करण्यात आली आहे. 3 लाख 30 तरुणांना रोजगार मिळाला ( 3 Lakh 30 Youths Got Employment ) आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक उद्योग आले, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई ( Subhash Desai Minister for Industries ) यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

माहिती देतांना उद्योगमंत्री सुभाष देसाई



'विमानतळ नामांतर लवकरच'

औरंगाबाद शहराचे नाव जनतेच्या मनात आधीच बदललेले आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळी घोषणा केली, तेव्हापासून जनतेच्या मनात आहे. प्रशासकीय बाबी नंतर होतीलच. त्याचबरोबर विमानतळाचे नामकरण करण्यासाठी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेणार असून त्यात विमानतळ धावपट्टी विस्तारबाबत चर्चा करणार असल्याची माहिती औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.

18 वर्ष खालील मुलांची होणार चाचणी

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याबाबत वेगळे धोरण अवलंबले जात आहे. त्याचा परिणाम म्हणजे लसीकरणाची टक्केवारी वाढली आहे. डिसेंबर महिना अखेर 100% लोकांचा पहिला डोस पूर्ण होईल. नंतर दुसरा डोस घेण्याबाबत जनजागृती केली जाईल. इतकच नाही तर 18 वर्ष खालील नागरिकांची तपासणी सुरू करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

हेही वाचा -Anil Parab Appeal ST Workers : एसटी कर्मचाऱ्यांना शेवटची संधी, सोमवारपर्यंत कामावर हजर व्हा - अनिल परब

Last Updated : Dec 10, 2021, 8:01 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details