औरंगाबाद - सुरतमध्ये कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत २० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर औरंगाबादेत खबदारीचे उपाय म्हणून खासगी कोचिंग क्लास चालकांना अग्निशामक विभागाने नोटीस जारी केली आहे.
शहरातील कोचिंग क्लासमध्ये अनुचित प्रकार घडू नये, यासाठी या नोटीस जारी केल्या आहेत. शहरातही जवळपास साडे तीनशे कोचिंग क्लास चालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. यात ८ दिवसांत कोचिंग क्लासमध्ये आग लागली तर विद्यार्थ्यांच्या बचावासाठी काय उपाय योजना आहेत, याबाबत लेखी उत्तर कोचिंग क्लास चालकांना देणे बंधनकारक आहे.