महाराष्ट्र

maharashtra

औरंगाबादच्या कुलस्वामिनी प्रतिष्ठानकडून गणेशोत्सवात 'पाणी बचतीचा संदेश'...

By

Published : Sep 3, 2019, 8:19 AM IST

गणेश उत्सवाच्या माध्यमातून अनेक गणेश मंडळ सामाजिक संदेश देत असतात. औरंगाबादचे कुलस्वामिनी प्रतिष्ठान हे देखील गेल्या काही वर्षांपासून सामाजिक संदेश देणासाठी परिचित आहे.

कुलस्वामिनी प्रतिष्ठान, औरंगाबाद

औरंगाबाद -शहरातील कुलस्वामीनी प्रतिष्ठानतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याची परंपरा आहे. या वर्षी देखील या प्रतिष्ठानने पाणी बचतीचा संदेश दिला आहे.

औरंगाबादच्या कुलस्वामिनी प्रतिष्ठानकडून गणेशोत्सवात 'पाणी बचतीचा संदेश'

या अगोदरही कुलस्वामीनी प्रतिष्ठानकडून सामाजिक जनजागृती

2018 च्या गणेश उत्सवात शेततळे तयार करा, पाणी अडवा, पाणी जिरवा असे संदेश देण्यात आले होते. यासाठी खुल्दाबाद येथील खिर्डी गावात शेततळ्यात तरंगणारा गणेशा साकारण्यात आला होता. यावर्षीही प्रतिष्ठानने जनतेला पाणी बचतीचा संदेश दिला आहे. यासाठी सिडको परिसरात अनेक ठिकाणी पाणी बचतीचा संदेश देणारे पोस्टर लावण्यात आले आहेत.

हेही वाचा... लालबागच्या राजाचं २४ तास LIVE दर्शन.. एका क्लिकवर

हेही वाचा... .....या गणपती समोरील कारंज्या ठरतायेत लोकांच्या आकर्षणाचे केंद्र

राज्यात यावर्षी अनेक ठिकाणी कमी पर्जन्यमान झाल्याने पाणी टंचाईची छाया गडद झाली आहे. त्यामुळे ईटीव्ही भारततर्फे पाणी बचत आणि जलसंवर्धन बाबत जनजागृती मोहीम राबवली आहे. या मोहिमेत पाणी बचती बाबत विविध माध्यमातून शक्य असलेल्या उपाय योजना जाणून घेण्यात येत आहेत. औरंगाबादच्या कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे दुष्काळग्रस्त भागात काही वर्षांपासून विविध उपाय योजनांबाबत जनजागृती केली जात आहे.

हेही वाचा... दुष्काळ आणि मंदीचे सावट दूर होऊ दे, धनंजय मुंडेंचे गणरायाला साकडे​​​​​​​

हेही वाचा बीडमध्ये महिलांनी पुढाकार घेत स्थापन केले गणेश मंडळ​​​​​​​

हेही वाचा... दुष्काळाच्या छायेतही गणेश भक्तांचा उत्साह शिघेला; लातुरात ढोल ताश्याच्या गजरात गणरायाचे आगमन​​​​​​​

ABOUT THE AUTHOR

...view details