महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 7, 2022, 2:19 PM IST

Updated : Jul 7, 2022, 3:33 PM IST

ETV Bharat / city

BJP Leader Kapil Mishra Amravati Visit : पोलीस प्रामाणिक असते तर उमेश कोल्हे यांचे प्राण वाचले असते- कपिल मिश्रा

उमेश कोल्हे यांच्या हत्येनंतर देशभरात पडसाद उमटले आहेत. भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी ( Kapil Mishra Help to Kolhe family ) अमरावतीला भेट देत कोल्हे कुटुंबाला मदत जाहीर केली आहे. ( BJP Leader Kapil Mishra Amravati Visit )

BJP Leader Kapil Mishra Amravati Visit
कपिल मिश्रा

अमरावती- पोलिसांची जबाबदारी ही नागरिकांचे संरक्षण करणे आहे. मात्र, अमरावतीच्या पोलीस आयुक्त या राजकीय दबावात काम करीत होत्या. खरेतर अमरावती 12 आणि 13 नोव्हेंबरला जो काही प्रकार घडल्यानंतर पोलीस आयुक्तांनी अमरावती शहरात दडलेल्या अशा दहशतवाद्यांचे पाळेमुळे उपटली असती तर आज कदाचित उमेश कोल्हे यांचे प्राण वाचले असते, असे भाजपचे नेते कपिल मिश्रा ( Kapil Mishra Amravati Visit ) यांनी म्हटले आहे. देशातील सर्वच पोलीस अधिकाऱ्यांनी कोणत्याही राजकीय दबावात काम न करता प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडावे, असेदेखील कपिल मिश्रा म्हणाले.

कपिल मिश्रा यांची प्रतिक्रिया

कोल्हे कुटुंबियांना केली 30 लाख रुपयांची मदत-नुपूर शर्माच्या समर्थनात पोस्ट शेअर केल्यामुळे अमरावतीत उमेश कोल्हे यांची ( Umesh Kolhe Murder Case ) हत्या झाली. अशा स्वरूपाची घटना राजस्थानमध्ये उदयपूर येथे टेलर कन्हैयालाल याचीदेखील हत्या ( Nupur Sharma post ) करण्यात आली. देशात जिहादी संघटना एका व्यक्तीची हत्या करून लाखो हिंदूंना घाबरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, आम्ही प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या मागे ताकदीने उभे आहोत. कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी हिंदू बांधवांना मदतीसाठी आव्हान करताच अवघ्या 24 तासात आमच्याकडे एक कोटी तीस लाख रुपये जमा झाले.

हेही वाचा-Umesh Kolhe Murder Case : 'एनआयए'चे अमरावतीत सर्च ऑपरेशन, सातही आरोपींच्या घरांसह विविध ठिकाणी धाड

कन्हैयालाल याच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये-कन्हैयालाल यांची परिस्थिती अतिशय नाजूक असल्यामुळे मी स्वतः उदयपूरला जाऊन कन्हैयालाल याच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये दिले. आज अमरावतीत उमेश कोल्हे यांच्या मुलाच्या बँक खात्यात मी येण्याच्या अर्धा तासापूर्वीच तीस लाख रुपये जमा झाले, असे कपिल शर्मा ( Kapil Mishra help to Kolhe family ) म्हणाले. कोल्हे कुटुंब यांना या प्रकरणात न्यायालयीन लढाई लढण्यासाठी पूर्णतः मदत आम्ही करू, असे देखील कपिल मिश्रा यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा-Umesh Kolhe Murder Case: उमेश कोल्हे हत्या प्रकरणात खासदार अनिल बोंडेंचे पोलिसांवर गंभीर आरोप

जिहादी संघटना उद्धवस्त कराव्यात-पी एफआय सारखी संघटना अमरावतीत असणे ही अतिशय धक्कादायक बाब आहे. ही संघटना सिमीतूनच उत्पन्न झाली आहे. पीएफ आयसह देशात अस्तित्वात असणाऱ्या या जेहादी संघटनांना उद्धवस्त करण्यात यावे, अशीच आमची मागणी आहे. तसे प्रयत्न देखील आहेत. देशातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी अशा संघटनांविरोधात धडक मोहीम राबवायला हवी.

देशात हिंदूंची हत्या-अमरावतीच्या पोलीस आयुक्तांनी 12 आणि 13 नोव्हेंबरला झालेल्या दंगलीनंतर शहरात अशा दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई मोहीम हाती घ्यायला हवीच होती, असे देखील कपिल मिश्रा म्हणाले. इस्लाम खतरे मे है, असे म्हणत देशातील अनेक नेते पत्रकार आणि वकील दहशतवाद्यांची पाठ राखण करीत असल्याबाबत कपिल मिश्रा यांनी खेद व्यक्त केला. आज देशात हिंदूंची हत्या होत आहेत. अशा मंडळींना भानावर आणणे आपले कर्तव्य असल्याचे देखील कपिल मिश्रा म्हणाले.

हेही वाचा-उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील सातही आरोपींना मुंबईत हलविले, एनआयए न्यायालयासमोर हजर करणार

Last Updated : Jul 7, 2022, 3:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details