महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'देवेंद्र फडणवीसांनी दौरा जाहीर केल्यानंतर मजबुरीने मुख्यमंत्र्यांना बाहेर निघावे लागले' - अमरावती जिल्हा बातमी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवार (दि. 20 ऑक्टोबर) तीन हजार आठशे रुपयांचा धनादेश देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करावी, अशी मागमी डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे.

डॉ. अनिल बोंडे
डॉ. अनिल बोंडे

By

Published : Oct 21, 2020, 4:26 PM IST

Updated : Oct 21, 2020, 6:10 PM IST

अमरावती -विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीचा दौरा जाहीर केल्यानंतरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मातोश्रीच्या बाहेर निघावे लागल्याची टीका किसान मोर्चाचे अध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे.

बोलताना डॉ. अनिल बोंडे
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा सध्या नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यामुळे प्रशासनाची शासनाची पोलखोल झाली आहे. अनेक ठिकामी अद्याप पंचनामे झाले नाहीत. कांदा, ऊस, सोयाबीन, कापूस आदी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत, असे ही बोंडे म्हणाले.मुख्यमंत्र्यांनी तर मंगळवार (दि. 20 ऑक्टोबर) तीन हजार आठशे रुपयांचा धनादेश देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी पूर्वी जी आश्वासने दिली होती, ती आश्वासन पूर्ण करावी. आता पंचनामे नको थेट मदत द्या,अशी ही मागणी डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे.
Last Updated : Oct 21, 2020, 6:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details