हैदराबाद:शेअर बाजारातीलजोखीम आणि खात्रीशीर उत्पन्न योजना यांच्यातील समतोल (Balance of risk and assured income in investments) साधण्यासाठी गुंतवणूकदारांनी त्यांच्या गुंतवणूक योजना बदलत्या काळाच्या मागणीनुसार जुळवून घेणे आवश्यक आहे. मुदत ठेवींमधील गुंतवणूक आणि सोन्याचे उत्पन्न (Invest in fixed deposits and gold jewelry) निश्चित परतावा देतात. आधी यालाच सर्वाधिक मागणी असायची. मात्र बदलत्या काळानुसार लोकांच्या आवडीनिवडीही बदलल्या. मात्र, सध्याची पिढी अशा खात्रीशीर उत्पन्नाच्या योजनांमध्ये पुरेसा रस दाखवत नाहीत. झटपट परतावा मिळण्याच्या आशेने ते घाईघाईने आणि जोखमीच्या गुंतवणुकीच्या शोधात असतात.
तरुण पिढी वेळोवेळी त्यांच्या गुंतवणुकीचा आढावा घेण्यास विसरत आहे आणि समतोल साधण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नाही. अशा प्रवृत्तींमुळे शेवटी अपेक्षित नफा मिळत नाही. कोविड-19 च्या प्रभावा नंतर नंतर शेअर बाजारात नवीन गुंतवणूकदार अनेक पटींनी वाढले (New investors increased in stock markets) तेव्हा ही परिस्थिती उद्भवली. विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांत डीमॅट खात्यां ची संख्या अनेक पटीने वाढली (Demat accounts increased multiple times in 2 years) आहे.
त्यांच्या पालकांच्या तुलनेत तरुणांची आर्थिक उद्दिष्टे पूर्णपणे भिन्न असतात. तरुण पिढी जलद आर्थिक स्वातंत्र्य शोधत (Faster financial freedom) आहे. त्यामुळेच त्यामध्ये कितीही जोखीम असली तरी ते उच्च उत्पन्न देणाऱ्या योजनांकडे वळत आहेत. गुंतवणूक करताना महागाई रोखण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात काहीच गैर नाही. त्याच वेळी, जर एखाद्याने काही सुरक्षा उपाय केले तर त्याचे चांगले परिणाम मिळतील.