नवी दिल्ली - दोन दिवसांत शेअर बाजारात मोठी पडझड झाली आहे. या पडझडीमुळे शेअर बाजार गुंतवणुकदारांच्या संपत्तीत ७ लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे. कोरोनाबाधितांचे देशात प्रमाण वाढल्याने गुंतवणुकदारांची चिंता वाढली आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ७४०.१९ अंशाने घसरून ४८,४४०.१२ वर स्थिरावला. तर दोन दिवसांत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १,६११.३२ अंशाने घसरला आहे. शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांचे भांडवली मूल्य हे ७,००,५९१.४७ कोटी रुपयांवरून १,९८,७५,४७०.४३ कोटी रुपये झाले आहे.
रिलीगेअर ब्रोकिंग लिं. कंपनीचे (संशोधन) उपाध्यक्ष अजित मिश्रा म्हणाले की, जागतिक बाजारात नकारात्मक स्थिती आहे. कोरोनाबाधितांची संख्या देशात वाढत आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांमध्ये शेअर विक्रीचा दबाव दिसून आला आहे. बीएसईमधील क्षेत्रनिहाय निर्देशांकात दूरसंचार, उर्जा, ऑटो आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर ३.१४ टक्क्यापर्यंत घसरले आहेत.
हेही वाचा-रिअलमीचा 8 श्रेणीत स्मार्टफोन लाँच; 108 मेगापिक्सेल आहे कॅमेरा