महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 1, 2021, 9:38 PM IST

ETV Bharat / business

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम; चालू आर्थिक वर्षाचा अंदाजित विकासदर घसरणार- एसबीआय

कोरोना महामारीने अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार असल्याने विकासदरावर परिणाम होणार असल्याचे एसबीआयच्या अर्थतज्ज्ञांनी म्हटले आहे. वेगाने लसीकरण करावे, असेही एसबीआयच्या अर्थतज्ज्ञांनी म्हटले आहे.

जीडीपी
जीडीपी

मुंबई - स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अर्थतज्ज्ञांनी आर्थिक वर्ष २२ मध्ये विकासदर हा ७.९ टक्के होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. यापूर्वी या अर्थतज्ज्ञांनी २०२२ मध्ये विकासदर हा १०.४ टक्के होईल, असा अंदाज व्यक्त केला होता.

कोरोना महामारीने अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार असल्याने विकासदरावर परिणाम होणार असल्याचे एसबीआयच्या अर्थतज्ज्ञांनी म्हटले आहे. वेगाने लसीकरण करावे, असेही एसबीआयच्या अर्थतज्ज्ञांनी म्हटले आहे.

हेही वाचा-दिलासादायक! स्पूटनिक व्हीचे ३० लाख डोस हैदराबादमध्ये दाखल

आंतरराष्ट्रीय बाजारातील वस्तुंच्या किमतीनेही जीडीपीच्या विकासदरावर परिणाम

कोरोना महामारीचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार असल्याचे आमच्या विश्लेषणातून दिसून आले. ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था शहरी भागाप्रमाणे बळकट नाही. मागणी वाढ झाली तरी आर्थिक वर्ष २०२२ मधील जीडीपीच्या अंदाजावर मोठा फरक पडणार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातील वस्तुंच्या किमतीनेही जीडीपीच्या विकासदरावर परिणाम होणार आहे. एकूण मागणीतील वाढ ही व्यापार, हॉटेल, वाहतूक, ब्रॉडकास्टिंगशी निगडीत संवाद आणि सेवा यांच्याशी निगडीत राहणार आहे. कारण, या क्षेत्रांमधून थेट २५ कोटी कुटुंबे अवलंबून आहेत.

हेही वाचा-एलपीजी गॅस सिलिंडर १२२ रुपयांनी स्वस्त; हॉटेलसह रेस्टॉरंट उद्योगांना होणार फायदा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम

कोरोनाची दुसरी लाट असताना आरबीआयने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये विकासदर १०.५ टक्के राहिल, असा अदांज केला आहे. मात्र, दुसऱ्या लाटेचा परिणाम पाहता, या अंदाजाचा आरबीआयकडून पुनरावलोकन होण्याची शक्यता आहे. तर काही विश्लेषकांकडूनही जीडीपीच्या सुधारित अंदाजात विकासदर ८.५ टक्के होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

देशाच्या जीडीपीमध्ये ७.३ टक्के घसरण

२०२०-२१ या आर्थिक वर्षात देशाच्या जीडीपीमध्ये ७.३ टक्के घसरण झाल्याचे समोर आले आहे. यापूर्वी २०१९-२० या आर्थिक वर्षात जीडीपीमध्ये ४ टक्क्यांची वाढ झालेली दिसून आली होती. केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) ही आकडेवारी जाहीर केली. गेल्या वर्षीचा भारताचा जीडीपी हा १४५ लाख कोटी रुपये होता. तो यावर्षी कमी होऊन १३५ लाख कोटी रुपयांवर आला आहे. तसेच, जीडीपीमधील वाढ ही गेल्यावर्षीच्या तुलनेत (४.०) यावर्षी उणे ७.३ टक्के झाली असल्याचे एनएसओने स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details