नवी दिल्ली - केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आघाडीच्या उद्योगपतींशी चर्चा केली. या चर्चेत अर्थव्यवस्थेला चालना देणे, नोकऱ्यांची निर्मिती वाढविणे आणि अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने या मुद्द्यांचा समावेश होता.
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी, टाटा ग्रुपचे रतन टाटा, टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज सुनिल भारती मित्तल, अब्जाधीश गौतम अदानी, महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा, खाणसम्राट अनिल अग्रवाल आदी उद्योगपतींशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चर्चा केली. यावेळी टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन, टीव्हीएसचे चेअरमन वेणू श्रीनिवासन, एल अँड टीचे प्रमुख ए. एम. नाईक हेदेखील उपस्थित होते.
हेही वाचा-सरकारच्या धोरणांविरोधात १० संघटनांचा ८ जानेवारीला देशव्यापी संप
पंतप्रधान मोदींनी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची भेटही घेतल्याचे बोलले जाते. मोदींनी सुमारे ६० आंत्रेप्रेन्युअर आणि एफएमसीजी, वित्त, अपारंपरिक उर्जा, हिरा, किरकोळ विक्री क्षेत्र, कापड उद्योग, एमएसएमई, स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगपतींची भेट घेतली आहे.