महाराष्ट्र

maharashtra

भाजपमधील 'या' चार चेहऱ्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाला दिली गती

By

Published : Jan 30, 2020, 7:01 AM IST

भाजपच्या चार महत्त्वाच्या नेत्यांनी अर्थसंकल्पातील काही तरतुदींवर प्रभाव टाकला असण्याची शक्यता आहे.

union Budget
केंद्रीय अर्थसंकल्प

नवी दिल्ली - गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय अर्थसंकल्प तयार करण्यासाठी भाजपमधील चार महत्त्वाच्या नेत्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना विविध माहिती व सूचना दिल्या आहेत. यामध्ये भाजपचे गोपाळ अग्रवाल, डॉ. सय्यद झफर इस्लाम, नरेंद्र तनेजा व अमित मालवीय यांचा समावेश आहे.

  • १. गोपाळ कृष्णा अग्रवाल

भाजप प्रवक्ते गोपाळ अग्रवाल यांनी उद्योग आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांमध्ये समन्वय साधण्याचे काम केले आहे. ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेर्सचे (आयआयसीए) संचालक आहेत. यापूर्वी ते बँक ऑफ बडोदाचे माजी संचालक होते. अर्थसंकल्प तयार करताना त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

पक्षाने प्रथमच उद्योगांचे तज्ज्ञ आणि प्रतिनिधींशी चर्चा केली आहे. भाजपने अशा ११ बैठका घेतल्या आहेत. अग्रवाल या बैठकीला उपस्थित राहिले आहेत. याबाबत बोलताना अग्रवाल म्हणाले, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी प्रत्येकाचे संयमाने आणि नोंद घेत ऐकून घेतले आहे. चालू वर्षात सुमारे विविध क्षेत्रातील २०० जणांनी बैठकीत भाग घेतल्याचे त्यांनी सांगितले.

  • २. डॉ. सय्यद झफर इस्लाम

भाजपचे दुसरे प्रवक्ते हे डटेच बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांच्याकडे भाजपने अर्थसंकल्पासाठी माहिती देण्याची जबाबदारी सोपविली आहे. ते सध्या एअर इंडियाचे संचालक आहेत. काम करण्यासाठी साचेबद्ध यंत्रणा नसते. अर्थसंकल्पासाठी व्हिजन काय आहे, हे पक्षांतर्गत सांगण्याची जबाबदारी त्यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्याने सोपविली आहे. अर्थसंकल्प हा ग्रामीण भाग, गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी समान वापरता येईल, असे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागासाठी अर्थसंकल्पात अधिक तरतूद असेल, अशी त्यांनी आशा व्यक्त केली. यापूर्वी भाजपने अर्थसंकल्पात गाव, गरीब, शेतकरी यांच्यावर लक्ष केंद्रित करावे, असे सीतारामन यांना सूचविले होते.

हेही वाचा-अर्थसंकल्प २०२० : कर संकलनात मोठी घट झाल्याने निर्मला सीतारामन यांच्या समोर आव्हान

  • ३. नरेंद्र तनेजा

तनेजा हे केवळ भाजपते प्रवक्ते नाहीत, तर उर्जा क्षेत्रातील विश्वसनीय व्यक्तीमत्व मानले जाते. ते ब्रिक्स बिझिनेस काउन्सिलचे प्रमुख आहेत. तसेच जागतिक उर्जा धोरण परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे भाजपकडून अर्थसंकल्प तयार करताना त्यांच्या अनुभवाचा वापर करण्यात येत आहे. सरकारने अधिक खर्च करावे, असे सूचविल्याचे त्यांनी सांगितले. शहरी अर्थव्यवस्थेच्या तुलनेत ग्रामीण अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. मागणी कमी होत आहे. ग्रामीण भागातून मागणी वाढविणे ही मुख्य किल्ली आहे.
अधिक नोकऱ्यांची निर्मिती करणे, ग्रामीण भागातील लोकांच्या हातात अधिक पैसे देणे आणि त्यांच्या खेडेगावामधून स्थलांतरण थांबविणे ही कल्पना आहे. त्यासाठी गावांमध्ये जलसंवर्धनाचे प्रकल्प आणि ग्रामीण पायाभूत प्रकल्प सूचविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा-अर्थसंकल्पाच्या भाषणात 'या' वापरण्यात येतात महत्त्वाच्या संज्ञा, जाणून घ्या अर्थ

  • ४. अमित मालवीय

अमित मालवीय यांना बँकिंग क्षेत्राचा मोठा अनुभव आहे. त्यांनी अर्थसंकल्प तयार होण्यापूर्वी काही महिने काम केले आहे. इलेक्ट्रिकल वस्तुंची देशात मोठ्या प्रमाणात आयात करण्यात येते. शर्टची बटणेही आयात करण्यात येतात. त्यांचे देशात उत्पादनात घेतल्याने मेक इन इंडियाला चालना मिळणार आहे. तसेच स्थानिक उद्योगांना चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
भाजपच्या या चार चेहऱ्यांनी अर्थसंकल्पातील काही तरतुदींवर प्रभाव टाकला असण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details