नवी दिल्ली - देशात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असताना सार्वजनिक बँकांकडील भांडवली निधीत कपात होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2 कोटी रुपयांहून अधिक रकमेवरील चक्रवाढ व्याज माफ करण्याचे केंद्र सरकारला निर्देश दिले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बँकांना भांडवली अर्थसहाय्य देण्याच्या निर्णयाचा केंद्राकडून पुनर्विचार करण्याची शक्यता आहे.
चालू आर्थिक वर्षात सार्वजनिक बँकांना लागणाऱ्या भांडवली अर्थसहाय्याचा केंद्रीय अर्थमंत्रालय पुनर्विचार करत आहे. कोरोना महामारीमुळे सार्वजनिक संस्थांवर ताण वाढत चालला आहे. कोरोनाच्या काळात बँकांकडील थकित कर्जाचे प्रमाण वाढत चालले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करताना सार्वजनिक बँकांसाठी 20 हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करण्याचे जाहीर केले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने मार्चमध्ये दिलेल्या निकालामुळे बँकांना 2 कोटी रुपयांहून अधिक कर्जावरील चक्रवाढ माफ करावे लागणार आहे. अशा परिस्थितीत बँकांना मिळणारे भांडवली अर्थसहाय्य पुरेसे ठरणार नाही.
हेही वाचा-जॅक मा यांना पुन्हा चीन सरकारचा दणका; अलिबाबाला ठोठावला 2.8 अब्ज डॉलरचा दंड