महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सायरस मिस्त्री प्रकरण: टाटा सन्सचे सर्वोच्च न्यायालयात अपिल

सायरस मिस्त्री प्रकरणात ६ जानेवारीपूर्वी तातडीने सुनावणी घ्यावी, यासाठी टाटा सन्सचे वकील सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार आहेत.

By

Published : Jan 2, 2020, 1:21 PM IST

Cyrus Mistry case
सायरस मिस्त्री प्रकरण

नवी दिल्ली - सायरस मिस्त्री प्रकरणात राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलीय प्राधिकरणाने दिलेल्या निकालाला टाटा सन्स कंपनीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सायरस मिस्त्री यांची चेअरमनपदी फेरनियुक्ती टाळण्यासाठी टाटा सन्सचे प्रयत्न आहेत.

राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलीय प्राधिकरणाने (एनसीएलएटी) दिलेल्या संपूर्ण आदेशाला टाटा सन्सने आव्हान दिले आहे. कंपनीच्या संचालक मंडळाची ९ जानेवारीला बैठक आहे. त्यापूर्वी एनसीएलएटीच्या निकालाला स्थगिती मिळावी, यासाठी कंपनीचे प्रयत्न आहेत. सायरस मिस्त्री प्रकरणात ६ जानेवारीपूर्वी तातडीने सुनावणी घ्यावी, यासाठी टाटा सन्सचे वकील सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार आहेत.

हेही वाचा - मारुती सुझुकीसह महिंद्राच्या वाहन विक्रीत डिसेंबरमध्ये वाढ


एनसीएलएटीने काय दिला होता निकाल?


एनसीएलएटीने मिस्त्री यांची टाटा सन्सच्या चेअरमनपदी पुन्हा नियुक्ती करण्याचे डिसेंबर २०१९ मध्ये आदेश दिले आहेत. तर एन. चंद्रशेखरन यांची कार्यकारी चेअरमनपदावरील नियुक्तीही एनसीएलएटीने बेकायदेशीर असल्याचे निकालात म्हटले होते. दोन सदस्यीय एनसीएलएटीने टाटा सन्सला सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे.

संबंधित बातमी वाचा -कंपनी व्यवहार मंत्रालयाची एनसीएलएटीमध्ये धाव; 'तो' शब्द वगळण्याची विनंती

संबंधित बातमी वाचा-टाटा सन्सच्या चेअरमन पदावर नियुक्ती देणाऱ्या निकालावर सायरस मिस्त्री म्हणाले...

संबंधित बातमी वाचा-सायरस मिस्त्री पुन्हा टाटा सन्सचे चेअरमन; एनएसीएलएटीचा निकाल

ABOUT THE AUTHOR

...view details