नवी दिल्ली- वित्तीय सेवा देणाऱ्या पेटीएमने कर्जवाटपाचे यंदा दुप्पट उद्दिष्ट निश्चित केले आहे. पेटीएमकडून एमएसएमई उद्योगांना मार्च -२१ पर्यंत १ हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात येणार आहे. गतवर्षी पेटीएमने ५५० कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप केले होते.
पेटीएमकडून एमएसएमई उद्योगांना विना तारण ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज विनातारण देण्यात येणार आहे. त्यासाठी कर्जाचा हप्ता दैनंदिन भरण्याचाही पर्यायही पेटीएमकडून उद्योगांना देण्यात येत आहे. विना तारण कर्जातून किराणा दुकानदार आणि इतर लहान व्यावसायिकांना मदत करण्याचा प्रयत्न असल्याचे पेटीएम लेडिंगचे भावेश गुप्ता यांनी सांगितले. या व्यावसायिकांना बँकांकडून सहज कर्ज मिळत नाही, असेही गुप्ता यांनी सांगितले.