लखनौ- केंद्र सरकारने खासगी संरक्षण कंपन्यांना भारतीय सैन्यदलाची चाचणी केंद्र वापरण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे नवी शस्त्रास्त्र व्यवस्था वेगाने विकसित होण्यासाठी मदत होणार असल्याचे कल्याणी ग्रुपचे चेअरमन बाबा कल्याणी यांनी म्हटले. ते लखनौमधील डिफेन्स एक्स्पोमध्ये बोलत होते.
बाबा कल्याणी यांनी ईटीव्ही भारतला विशेष मुलाखत दिली. ते म्हणाले, आमच्याकडे सहा प्रकारच्या तोफा आहेत. कमी वेळात तोफा तयार करण्याचा जागतिक विक्रम आहे, असे मला वाटते. पुढे ते म्हणाले, देशात उत्पादन क्षमतांचा विकास केल्यास संरक्षण क्षेत्रात 'मेक इन इंडिया'चे धोरण राबविणे शक्य आहे. संरक्षण उद्योगाची क्षमता, शक्यता आणि गुंतवणूक विकसित करण्याची गरज आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी कधीच क्षमता नव्हती, असे तंत्रज्ञान तयार करण्याची गरज आहे.
हेही वाचा-पीएमसी बँक घोटाळा : एचडीआयएलची मालमत्ता विकण्याला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती